शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळल्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या ९ एक्सप्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST

जळगाव : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री पावसामुळे दरड कोसळल्यामुळे गुरूवारी पहाटे पासूनच मुंबईकडून जळगावला येणाऱ्या व जळगावहून मुंबईकडे ...

जळगाव : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री पावसामुळे दरड कोसळल्यामुळे गुरूवारी पहाटे पासूनच मुंबईकडून जळगावला येणाऱ्या व जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. यामुळे गुरूवारी मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या ९ सुपरफास्ट गाड्या रद्द करण्यात आल्या. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या सुरत-वसई मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही दरड कोसळल्यामुळे नाशिक, मनमाड व भुसावळ पर्यंत धावल्या असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी मध्यरात्री तर पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णत बंद झाला आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईकडून निघालेल्या गाड्या पुन्हा सीएसटी स्टेशनकडे माघारी फिरविण्यात आल्या. तर जळगावहून मुंबईकडे रात्री निघालेल्या अनेक गाड्या जागेवरच थांबविण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने मुंबईकडून येणाऱ्या काशी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस या महत्वाच्या गाड्यासह सुमारे १२ गाड्या रद्द केल्या आहेत.

इन्फो :

मुंबईहून रद्द करण्यात आलेल्या गाड्या

- काशी एक्सप्रेस

- हावडा एक्सप्रेस

- मुंबई- शालिमार एक्सप्रेस

-मुंबई-बनारस एक्सप्रेस

-छपरा एक्सप्रेस

-पवन एक्सप्रेस

- अमरावती एक्सप्रेस

-गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस

-सेवाग्राम एक्सप्रेस

इन्फो :

मुंबईकडून सुरतमार्गे येणाऱ्या गाड्या

-महानगरी एक्सप्रेस

-बनारस एक्सप्रेस

- अमृतसर एक्सप्रेस

-गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस

इ्न्फो :

काशी एक्सप्रेस भुसावळ पासून रद्द

रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे काही गाड्या सुरत मार्गे रवाना करण्यात आल्या. तर काशी एक्सप्रेस मुंबईला रवाना न करता, भुसावळपासूनच रद्द करण्यात आला आणि भुसावळहून पुन्हा गोरखपूर कडे रवाना करण्यात आला. या गाडीतील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या गाडीने सुरतमार्गे मुंबईला जावे लागले.

इन्फो :रेल्वेने अनेक प्र‌वाशांना सोडले बसने मुंबईला

जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे, राजधानी एक्सप्रेस व सेवाग्राम एक्सप्रेस जळगाव पासून रद्द करण्यात येणार होत्या. त्यामुळे प्रवाशांनी काहीही करून मुंबईला सोडून देण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सीनिअर डीसीएम युवराज पाटील यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यांशी संपर्क साधून, बसेसची उपलब्ध करून दिल्या. मात्र, अचानक या प्रवाशांनी बसेसला विलंब होणार असल्यामुळे, सुरत मार्गे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांमधुन जाणे पसंत केले. मात्र, सेवाग्राम एक्सप्रेसच्या प्रवाशांना नाशिकहून बसने मुंबईला रवाना करण्यात आले असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. तसेच ही दरड कोसळल्यामुळे सोमवारी भुसावळ विभागातील एकूण २६ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, २१ गाड्या या अर्ध्या रस्त्यातूनच रद्द करण्यात आल्या. तसेच २४ गाड्या विविध मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी तिकीटे रद्द केल्यामुळे, दिवसभरात विविध स्टेशवरून दीड लाख रूपयांचा परतावा प्रवाशांना दिला असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.