शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

८७९ शाळांचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:38 IST

६७५ ठिकाणी वीज मीटरच नाही

ठळक मुद्दे ७६ लाख १७ हजार रूपयांची थकबाकी

जळगाव : इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे जि़प़शाळांच्या विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे, यासाठी शासन आणि प्रशासनाचा नेहमीच आग्रह असतो़ मात्र, दुसरीकडे वीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ८७९ प्राथमिक जिल्हा परिषद शाळांची बत्ती गुल झाली आहे़ या शाळांकडे तब्बल ७६ लाखांची वीज बिलाची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण सोडाच साधे संगणक शिक्षणही मिळेनासे झाले आहे़विज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी व्हावे, सोबतच त्यांना एका क्लीकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी, यासाठी शासनाने डिजीटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. या डिजीटल शाळांसाठी अनुदान न देता समाजातील लोकांना भावनिक आवाहन करून त्यांच्या पैशांतून आपापल्या गावातील शाळा डिजीटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. त्यानुसार शिक्षक, मुख्याध्यापकांनी जबाबदारी पेलत जिल्ह्यातील १८३१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपैकी १६१५ शाळा डिजीटल केल्या़ एवढेच नव्हे तर ६६ शाळा आयएसओही झाल्या़ डिजीटल शाळांसाठी व इतर उपक्रमांसाठी शासनाने अनेक शाळांना संगणक, एलसीडी, प्रोजेक्टर्स दिलेले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, त्यासंबंधीचे शिक्षण द्यावे, यावर भर दिला जात आहे़ मात्र, जिल्ह्यातील तब्बल ८७९ प्राथमिक शाळांचा वीज पुरवठाच खंडित असल्यामुळे डिजीटल शिक्षण व साहित्याचा उपयोगच काय? असा सवाल आता शिक्षण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे़७६ लाखांची थकबाकीआज जिल्ह्यातील जवळपास ८७९ च्या शाळांकउे ७६ लाख १७ हजार ७२ रूपये एवढे वीज बिल थकले आहे. शासनाकडून वीज बिलासाठी व शाळा डिजीटल करण्यासाठी एकही रूपयांचे अनुदान देण्यात आलेले नाही़, अशी माहिती मिळाली.मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खिशातून पैसे१८३१ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी फक्त ११५६ शाळांना वीज मीटर आहेत़ तर उर्वरित ६७५ शाळांना वीज मीटरच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ दरम्यान, एकूण शाळांपैकी ९५२ शाळांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊन नये म्हणून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यांच्या खिशातील पैसे वीज बिलासाठी मोजावे लागतात़ त्यामुळे शाळांची वीज सुरळीत होत आहे.