शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उपमहापौरांच्या जनता दरबारात ८० टक्के रस्त्यांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी गुरुवारपासून ‘जनता दरबार’ सुरु केला. पहिल्याच दिवशी शहरातील १५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी गुरुवारपासून ‘जनता दरबार’ सुरु केला. पहिल्याच दिवशी शहरातील १५० हून नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी उपमहापौरांसमोर मांडल्या. यामध्ये ८० टक्के नागरिकांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली असून, खराब रस्त्यांवर काहीतरी तोडगा लवकर काढा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. उपमहापौरांकडे नागरिकांनी रस्त्यांच्या समस्येसह अस्वच्छता, अतिक्रमण व पेन्शनच्या समस्यांचा पाढा देखील मांडला.

मनपाच्या आवारात प्रथमच अशा प्रकारचा जनता दरबार भरवण्यात आला. यावेळी उपमहापौरांसह महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, ॲड शुचिता हाडा, अमित काळे, चेतन सनकत, गायत्री राणे, मनोज आहुजा, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे,ॲड. दिलीप पोकळे याच्यांसह मनपातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

रस्ते असे की पायी चालणेही कठीण

शिवकॉलनी भागातील काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. अमृत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली असून, खोदकाम झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने काही महिलांनी रस्त्यांचा प्रश्नावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची समस्या भयंकर असून, संपुर्ण शहरात पायी चालणेही कठीण झाले असून, रस्त्यांचे काहीतरी करा अशी मागणी महिलांनी केली. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी देखील रस्त्यांच्या प्रश्नावरच आपल्या अडचणी मांडल्या. मनपा प्रशासनाने दुसरे कामे सोडून आधी रस्त्यांचा विषय मार्गी लावावा अशाही व्यथा नागरिकांनी मांडल्या. उपमहापौरांनी अडचणी ऐकून घेवून सर्व तक्रारी संबधित विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच नवीन रस्त्यांचे काम होईपर्यंत दुरुस्ती करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

महापालिकेत ३० ते ३५ वर्ष सेवा केल्यानंतरही मनपा प्रशासनाने अजूनही अनेकांना पेन्शन लागू केलेली नाही. पेन्शनसाठी दररोज मनपात हेलपाटे खावे लागत असून, मनपाने आता तरी आमचा विचार करावा अशी मागणी परवेज खान आमीरखान पठाण यांनी केली. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा असा ठराव १५ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेने केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती पठाण यांनी दिली.

या विषयांवर मांडल्या समस्या

अमृत योजना – भुयारी गटारी यांमुळे नादुरुस्त झालेले रस्ते, अस्वच्छता, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री पसरणारे अंधाराचे साम्राज्य, अव्यवस्थित ओपन स्पेस, डासांचा उपद्रव, खड्डयामुळे वाहन चालवितांना होणारे हाल, खड्डे न बुजल्याने घडणारे किरकोळ अपघात, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आदींबाबत नागरीकांनी जनता दरबारात गाऱ्हाणी मांडली. जनता दरबारात सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित असल्याने किरकोळ तक्रारींबाबत जागीच कार्यवाही योजण्यात आली. या व्यतिरिक्त अनेकांनी लेखी स्वरुपातही तक्रारी दाखल केल्या.