शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

दरमहा 8 लाख 50 हजार लिटर केरोसिनची होणार बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:21 IST

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव शहर व ग्रामीण भागात केरोसिन वितरण पूर्णत: बंद करण्यात आले

जळगाव :- जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव शहर व ग्रामीण भागात केरोसिन वितरण पूर्णत: बंद करण्यात आले असून संपूर्ण जळगाव जिल्हा केरोसिनमुक्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.जिल्ह्यात दरमहा 8 लाख 50 हजार केरोसिनची मागणी होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही मागणी शून्यावर आली असून यामुळे दरमहा 8 लाख 50 हजार केरोसिनची बचत होणार आहे. जाधव पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ई- पॉस मशिनद्वारे धान्य वितरण केले जात असून याचे प्रमाण 81 टक्के आहे. तर जिल्ह्यातील 90.43 टक्के शिधापत्रिकांचे आधार सिडींग झालेले आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आदिवासीबहुल क्षेत्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.जिल्ह्यात 1 मे 2018 पासून एईपीडीएस वितरण पद्धत लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण 1921 स्वस्त धान्य दुकाने असून त्यापैकी महिला बचत गटांची 96, अनुसूचित जाती घटकांची 129, अनुसूचित जमाती घटकांची 60 तर माजी सैनिकांची 4 व ग्रामपंचायतीचे 1 आहेत. यांच्यामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना राबविण्यात येत असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.