शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

हवेच्या शुद्धीकरणाचा ७६ लाखांचा निधी मनपाकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST

जळगाव : देशभरातील १३८ शहरांची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. त्यात जळगावचा समावेश आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ...

जळगाव : देशभरातील १३८ शहरांची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. त्यात जळगावचा समावेश आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला दोन वर्षांचा निधी हा अखर्चित आहे. २०१९ -२० मध्ये दहा लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी काही निधी हा खर्च झाला. २०२०-२१ मध्ये ७६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता हा संपूर्ण निधी पडून असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.

शनिवारी सायंकाळी डॉ.राधेश्याम चौधरी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, २०१९-२० चा निधी मिळाला होता. त्यातून मनपात काही व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित निधी शिल्लक आहे. २०-२१चा ७६ लाखांचा निधीदेखील खर्च करण्यात आलेला नाही. याबाबत निरी (राष्ट्रीय प्रदूषण अभियांत्रिकी अनुसंधान) ने याबाबत सुक्ष्म नियोजन केले होते. त्याचा आराखडा मनपाला पाठविला होता. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता खूप ढासळली आहे. धुळीचे लोट उठतात. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडत आहे. मात्र, मनपाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आलेला निधी खर्चच केला नाही. हा खर्च न केल्याने पुढील पाच वर्षांपर्यंतचा निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. कारण ही कामे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घ्यायचे आहे. मात्र, या निधीबाबत आयुक्तांनाच माहिती नव्हती. त्यांनी संबंधित अभियंत्याला विचारणा केल्यानंतर त्याने निधी शिल्लक असल्याचे सांगितले असल्याचेदेखील डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, २०२१ मध्ये निधी परत गेल्याचा परिणाम हा पुढील पाच वर्षे होणार आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार. या दिरंगाईबद्दल मनपा प्रशासन आणि सत्ताधारी कुणावर जबाबदारी निश्चित करणार, असा प्रश्नदेखील डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला.