शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 75 हजार वृक्ष लागवड

By admin | Updated: July 6, 2017 11:41 IST

प्रतिष्ठानचे कार्य समाजाला निश्चित प्रेरणादायी असल्याची भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

 ऑनलाईन लोकमत

जामनेर,दि.6- धार्मिक, सामाजिक क्षेत्रात देशहिताचे विविध उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नि:स्वार्थीपणे राबविले जातात. प्रतिष्ठानचे सर्वच सदस्य अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणाने समाज कार्य यशस्वीपणे पार पाडत असतात, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यासारखे देशहिताचे उपक्रम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी कोणाचीही मदत न घेता राज्यभर राबविले. त्यांचे सर्वच उपक्रम स्तुत्य असल्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. या प्रतिष्ठानतर्फे जामनेरसह तीन तालुक्यात 75 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
तालुक्यातील टाकळी गावाजवळ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे गेल्या वर्षी एक हजार वृक्ष लागवड करण्यात आली होती. या वृक्षांचे संवर्धन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. या संवर्धनाची पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन यांनी येथे भेट दिली असता, ते बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी 850 वृक्षांचे संवर्धन होऊन जगविण्यात आले. उर्वरित 150 नवीन वृक्षांची लागवड महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
टाकळी ग्रामपंचायतीने वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची व्यवस्था गेल्या वर्षभरापासून उपलब्ध करून दिली आहे. या वेळी नगराध्यक्ष साधना महाजन, जे. के.चव्हाण, रजनी चव्हाण, नवल पाटील, चंद्रकांत बाविस्कर, हेमंत वाणी उपस्थित होते. 
राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेत शासन, लोकसहभाग व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा समावेश आहे. आज जामनेर, जळगाव व एरंडोलमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पाच हजार  सदस्यांनी वनविभागाच्या हद्दीत 75 हजार वृक्ष लागवड केली.