शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर ते सुरत रेल्वे गेटपर्यंत ७५ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सर्वच मुख्य रस्त्यांची चाळण झाली असतांना, दुसरीकडे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचींही प्रचंड ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सर्वच मुख्य रस्त्यांची चाळण झाली असतांना, दुसरीकडे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचींही प्रचंड दुरवस्था झाली आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या शिवाजीनगर ते सुरत गेटपर्यंतच्या रस्त्याची `लोकमत` प्रतिनिधीने पाहणी केली असता, या रस्त्यावर लहान-मोठे ७५ खड्डे दिसून आले. खड्डयांसोबतच या रस्त्याच्या साईडपट्टयांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणाहून वाहन काढतांंना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

इन्फो :

रस्त्याच्या एका बाजूने ४५ खड्डे

शिवाजी नगरातील रिक्षा थांब्यापासून सुरत रेल्वे गेटकडे जातांना काही ठिकाणी रस्ता चांगला आहे. मात्र, साईडपट्टया उखडलेल्या आहेत. पुढे गेंदालाल मिल समोरील रस्त्यावर ठिकठिकाणी २० ते २५ फुटाच्या अंतरावर लहान -मोठे खड्डे पडलेले दिसून आले. या रस्त्यावर काही ठिकाणी पूर्णपणे डांबर निघाल्यामुळे, मातीचा रस्ता झालेला दिसून आला. गेंदालाल मिलच्या पुढे सालार नगर, दुध फेडरेशन व सुरत गेटपर्यंतच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खड्डे पडलेेले दिसून आले. काही ठिकाणी मोठे खड्डे झाल्यामुळे, वाहनधारकांनी मुरूम टाकला होता. मात्र, व्यवस्थितपणे मुरूम न टाकल्यामुळे खालीवर रस्ता झालेला दिसून आला. यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. एकंदरीत एका बाजूच्या मार्गावर ४५ हून अधिक खड्डे दिसून आले.

इन्फो :

दुध फेडरेशन समोरच रस्ता उखडलेला

सुरतगेट कडून पुन्हा शिवाजी नगरकडे येतांना या रस्त्याची दुसरी बाजूही खड्डेमय झालेली दिसून आली. या रस्त्यावर दुध फेडरेशन समोर रस्ता उखडलेला दिसून आला. तसेच तीन ते चार ठिकाणी खड्डेही पडलेले दिसून आले. यामुळे वाहनधारकांना संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या यापुढे शिवाजीनगरकडे येतांना ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, यातून दगड-गोटे बाहेर आल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सालार नगरपासून पुढे गेेंदालाल मिलच्या अलीकडील रस्त्याची साईडपट्टयांची बाजू पूर्णपणे उखडलेली दिसून आली. पावसामुळे या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

इन्फो :

रस्त्याच्या कामाची खडी इतरत्र पसरल्याने अपघाताचा धोका

मनपा प्रशासनातर्फे या रस्त्याच्या कामासाठी गेल्या काही महिन्यांपासून खडी टाकलेली आहे. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरूवात केलेली नाही. मात्र, ही खडी अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरली आहे. परिणामी यामुळे खडीवरून चाक गेल्यास, वाहन घसरण्याची किंवा टायर पंक्चर होण्याची शक्यता वाहनधारकांमधून वर्तविण्यात येत आहे. तसेच यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.