शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
5
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
6
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
7
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
8
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
9
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
10
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
11
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
12
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
13
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
14
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
15
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
16
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
17
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
18
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
19
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
20
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

२२ कोटींच्या निधीतून होणार शहरातील ७३ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

जळगाव - शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून मनपाला नुकत्याच मंजूर झालेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ७३ कामांसाठी ...

जळगाव - शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून मनपाला नुकत्याच मंजूर झालेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ७३ कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लवकरच स्थायीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असल्याने आता मनपाकडून शासन व इतर माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा विनीयोग शहरातील रस्त्यांवरच करण्याचा निर्णय घेण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून मनपाला मिळालेल्या मात्र सद्यस्थितीत स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतील इतर घेण्यात आलेली कामे रद्द करून, आता त्या निधीतून सर्व कामे हे रस्त्यांचीच केली जाणार आहेत, तसेच गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपासाठी मंजूर केलेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतूनही शहरातील ठराविक भागांमधील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात निविदांची कामे पूर्ण करण्यावर भर

शहरात आता अमृत योजनेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्गदेखील मोकळा होणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीसह मनपाला जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, या रस्त्यांच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू झाले आहे. लवकरच अंदाजपत्रक तयार केल्यानंतर सप्टेंबरपर्यंत सर्व कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण करून, सप्टेंबरमध्ये कार्यादेश देऊन पावसाळ्यानंतरच लागलीच कामांना सुरुवात करण्यावर मनपा प्रशासनाचा भर सुरू आहे.

पावसाळ्यातही डांबरी रस्त्यांची दुरुस्ती सुरूच

एकीकडे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात पावसाळ्याआधीच रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असताना, ठेकेदारांनी पावसाळ्याआधी रस्त्याची दुरुस्ती केली नाही; मात्र आता पावसाळा सुरू असताना अनेक ठेकेदारांकडून डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा शहाणपणा सूचत आहे. डांबर व पाण्याचे एकप्रकारे वैरच मानले जाते, अशा परिस्थितीत पावसाळ्यात दरुस्तीची सर्व कामे बंद असतात; मात्र अनेक महाभाग ठेकेदारांकडून आता पावसाळ्यातच दुरुस्तीची कामे केली जात आहेत. कामे झाल्यावर शहरात जोरदार पाऊस झाल्यास काही दिवसातच हे रस्ते उखडून पडतील. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसानदेखील होईल; तसेच या कामांच्या गुणवत्तेवरदेखील प्रश्न उभा राहत आहे.