शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२२ कोटींच्या निधीतून होणार शहरातील ७३ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

जळगाव - शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून मनपाला नुकत्याच मंजूर झालेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ७३ कामांसाठी ...

जळगाव - शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून मनपाला नुकत्याच मंजूर झालेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ७३ कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लवकरच स्थायीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असल्याने आता मनपाकडून शासन व इतर माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा विनीयोग शहरातील रस्त्यांवरच करण्याचा निर्णय घेण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून मनपाला मिळालेल्या मात्र सद्यस्थितीत स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतील इतर घेण्यात आलेली कामे रद्द करून, आता त्या निधीतून सर्व कामे हे रस्त्यांचीच केली जाणार आहेत, तसेच गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपासाठी मंजूर केलेल्या २२ कोटी रुपयांच्या निधीतूनही शहरातील ठराविक भागांमधील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात निविदांची कामे पूर्ण करण्यावर भर

शहरात आता अमृत योजनेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्गदेखील मोकळा होणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीसह मनपाला जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, या रस्त्यांच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू झाले आहे. लवकरच अंदाजपत्रक तयार केल्यानंतर सप्टेंबरपर्यंत सर्व कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण करून, सप्टेंबरमध्ये कार्यादेश देऊन पावसाळ्यानंतरच लागलीच कामांना सुरुवात करण्यावर मनपा प्रशासनाचा भर सुरू आहे.

पावसाळ्यातही डांबरी रस्त्यांची दुरुस्ती सुरूच

एकीकडे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात पावसाळ्याआधीच रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असताना, ठेकेदारांनी पावसाळ्याआधी रस्त्याची दुरुस्ती केली नाही; मात्र आता पावसाळा सुरू असताना अनेक ठेकेदारांकडून डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा शहाणपणा सूचत आहे. डांबर व पाण्याचे एकप्रकारे वैरच मानले जाते, अशा परिस्थितीत पावसाळ्यात दरुस्तीची सर्व कामे बंद असतात; मात्र अनेक महाभाग ठेकेदारांकडून आता पावसाळ्यातच दुरुस्तीची कामे केली जात आहेत. कामे झाल्यावर शहरात जोरदार पाऊस झाल्यास काही दिवसातच हे रस्ते उखडून पडतील. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसानदेखील होईल; तसेच या कामांच्या गुणवत्तेवरदेखील प्रश्न उभा राहत आहे.