शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलाव परिसरातील ७० लाखांचे वृक्ष जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST

ऑक्सिजन पार्क नावालाच : मनपाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत अंतर्गत शहरातील विविध भागांत ऑक्सिजन पार्क तयार ...

ऑक्सिजन पार्क नावालाच : मनपाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत अंतर्गत शहरातील विविध भागांत ऑक्सिजन पार्क तयार करण्यात येत आहे. मेहरुण तलाव परिसरातदेखील दीड वर्षापूर्वी ऑक्सिजन पार्क अंतर्गत ७० लाखांची निविदा काढून या भागात सुमारे १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, दीड वर्षानंतर या ठिकाणचे ९० टक्के वृक्ष जळाले आहेत. तर काही ठिकाणी केवळ वृक्षांच्या काड्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाचे ७० लाख रुपये पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.

‘लोकमत’ चमूने या भागात जाऊन पाहणी केली असता, मनपाच्या या वृक्षारोपणाचे पितळ उघडे पडले. ऑक्सिजन पार्कसाठी ७० लाख रुपयांची निविदा काढून तलावाभोवती वृक्ष लावण्याचे काम देण्यात आले आहे. या निविदेनुसार मक्तेदाराला या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ९० टक्के वृक्ष जळाले आहेत.

खड्डेच खोदले, वृक्षलागवडच नाही

या पाहणीत या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, ५० टक्के खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवडच झाली नसल्याचे या पाहणीच्या वेळी आढळून आले. त्यामुळे हे खड्डे केवळ नावालाच खोदण्यात आले असून, अजूनही वृक्ष लागवडीच्या प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले.

ना संगोपन, ना देखभाल

मेहरुण भागातील रोहिदास भोई हे मेहरुण तलाव परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. त्यांनी सांगितले की, या ठिकाणी वृक्षांची लागवड केल्यानंतर त्या वृक्षांकडे मनपा किंवा इतर कोणत्याही मक्तेदाराने फिरकूनदेखील पाहिले नाही. काही थोडे-थोडके वृक्ष जगले आहेत. कारण या ठिकाणी अनेक पर्यावरण प्रेमींकडून या वृक्षांना पाणी दिले जात होते. तसेच विशेष लक्ष दिले जात होते. त्यामुळे ठरावीक वृक्ष जगले आहेत. मनपाने लक्ष दिले असते तर कदाचित अनेक वृक्ष या ठिकाणी जगले असते, अशी माहिती भोई यांनी दिली.

मोठे वृक्ष जगले

ऑक्सिजन पार्कमध्ये जे मोठे वृक्ष लावण्यात आले होते त्यापैकी काही वृक्ष जगले आहेत. मात्र, जॉगिंग ट्रॅकलगत लावण्यात आलेले जवळपास सर्वच वृक्ष जळाले आहेत.