शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

6 रस्ते मालकी बदलावरून खंडपीठाने शासनाला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:31 IST

मनपाला न विचारता निर्णय कसा ? : आयुक्तांसह 8 जणांना नोटीस

जळगाव : दारू दुकाने वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे रस्ते मालकीत बदल करून महापालिकेकडे सोपविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात बुधवारी कामकाज झाले. त्यात 6 रस्त्यांपैकी 2 रस्ते केंद्र सरकारच्या 3 जानेवारी 2017 च्या गॅङोट मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून नमूद करण्यात आले आहेत. त्यावर न्यायमूर्तींनी राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीहक्क बदलाचे  अधिकार कुणाला आहेत? असे सरकारी वकिलांना विचारत राज्य सरकारने मनपा चे म्हणणे  ऐकून  न घेता घाई घाईने हा निर्णय कसा घेतला? असे फटकारल्याची माहिती डॉ.चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार  आहे . उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात डॉ राधेश्याम चौधरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्या.के एल वडणे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. सरकारतर्फे चीफ कौन्सिल अमरजितसिंग गिरासे तर डॉ़ राधेश्याम समांतर रस्त्यांच्या विकासासंदर्भात डॉ. चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिके दरम्यान 14 फेब्रुवारी रोजीआयुक्तांनी जळगाव मनपाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे मनपा फंडातून समांतर रस्ते विकसित करण्यास मनपा असमर्थ असल्याचे लिहून दिले आहे. मग एकाच महिन्यात मनपाची आर्थिक स्थिती कशी सुधारली? अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर सरकारी वकिलांनी 2001 च्या नगरपालिकेच्या मागणीवरून रस्ते अवर्गीकृत केल्याचे सांगितले. त्यावर अॅड.पाटील यांनी 16 वर्ष जुन्या नगरपालिकेच्या ठरावाचा आधार घेत हे 6 रस्ते आमदार सुरेश भोळे यांच्या 3 मार्च 2017 च्या पत्रानेच दारू विक्री करणारी दुकाने वाचवण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले. याबाबत मनपाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. तसेच आमदारांचे ते पत्रही न्यायालयास दाखवले. त्यावर न्यायालयाने ‘तर मग या 6 रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च लिकर लॉबी देणार काय?’ असा संतप्त सवाल सरकारी वकिलांना विचारत खडसावले विनोद पाटील यांनी बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाच्या दारू विक्री दुकानासंदर्भात आदेशातील  पॅरा 22 मध्ये ‘ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पळवाट काढू नये ’ असे तर ‘मार्गदर्शक सूचनांमध्ये क्र. 2 वर  दारूविक्रीची दुकाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या शहराच्या हद्दीतून जाणा:या रस्त्यांवरदेखील बंद झाले पाहिजे’ असे नमूद केल्याचे व त्यानंतरही आमदार सुरेश भोळे यांच्या पत्रावरून शासनाने ही पळवाट काढल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.या 6 रस्त्यांपैकी 2 रस्ते केंद्र सरकारच्या             3 जानेवारी 2017 च्या गॅङोटमध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून नमूद करण्यात आले आहेत. असे असतानाही शासनाने केवळ दारू दुकाने वाचविण्यासाठी हे राष्ट्रीय महामार्गदेखील नगरपालिकेच्या 16 वर्ष जुन्या ठरावाच्या आधारे अवर्गीकृत (मालकीत बदल) करून टाकल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करण्याचे अधिकार कुणाला आहेत?असे सरकारी वकिलांना विचारले. तर मग राज्य सरकारने मनपा चे म्हणणे न ऐकून घेता घाई घाईने हा निर्णय कसा घेतला ? या शब्दात शासनाला फटकारले.