शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

6 रस्ते मालकी बदलावरून खंडपीठाने शासनाला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:31 IST

मनपाला न विचारता निर्णय कसा ? : आयुक्तांसह 8 जणांना नोटीस

जळगाव : दारू दुकाने वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे रस्ते मालकीत बदल करून महापालिकेकडे सोपविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात बुधवारी कामकाज झाले. त्यात 6 रस्त्यांपैकी 2 रस्ते केंद्र सरकारच्या 3 जानेवारी 2017 च्या गॅङोट मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून नमूद करण्यात आले आहेत. त्यावर न्यायमूर्तींनी राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीहक्क बदलाचे  अधिकार कुणाला आहेत? असे सरकारी वकिलांना विचारत राज्य सरकारने मनपा चे म्हणणे  ऐकून  न घेता घाई घाईने हा निर्णय कसा घेतला? असे फटकारल्याची माहिती डॉ.चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार  आहे . उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात डॉ राधेश्याम चौधरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्या.के एल वडणे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. सरकारतर्फे चीफ कौन्सिल अमरजितसिंग गिरासे तर डॉ़ राधेश्याम समांतर रस्त्यांच्या विकासासंदर्भात डॉ. चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिके दरम्यान 14 फेब्रुवारी रोजीआयुक्तांनी जळगाव मनपाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे मनपा फंडातून समांतर रस्ते विकसित करण्यास मनपा असमर्थ असल्याचे लिहून दिले आहे. मग एकाच महिन्यात मनपाची आर्थिक स्थिती कशी सुधारली? अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर सरकारी वकिलांनी 2001 च्या नगरपालिकेच्या मागणीवरून रस्ते अवर्गीकृत केल्याचे सांगितले. त्यावर अॅड.पाटील यांनी 16 वर्ष जुन्या नगरपालिकेच्या ठरावाचा आधार घेत हे 6 रस्ते आमदार सुरेश भोळे यांच्या 3 मार्च 2017 च्या पत्रानेच दारू विक्री करणारी दुकाने वाचवण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले. याबाबत मनपाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. तसेच आमदारांचे ते पत्रही न्यायालयास दाखवले. त्यावर न्यायालयाने ‘तर मग या 6 रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च लिकर लॉबी देणार काय?’ असा संतप्त सवाल सरकारी वकिलांना विचारत खडसावले विनोद पाटील यांनी बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाच्या दारू विक्री दुकानासंदर्भात आदेशातील  पॅरा 22 मध्ये ‘ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पळवाट काढू नये ’ असे तर ‘मार्गदर्शक सूचनांमध्ये क्र. 2 वर  दारूविक्रीची दुकाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या शहराच्या हद्दीतून जाणा:या रस्त्यांवरदेखील बंद झाले पाहिजे’ असे नमूद केल्याचे व त्यानंतरही आमदार सुरेश भोळे यांच्या पत्रावरून शासनाने ही पळवाट काढल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.या 6 रस्त्यांपैकी 2 रस्ते केंद्र सरकारच्या             3 जानेवारी 2017 च्या गॅङोटमध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून नमूद करण्यात आले आहेत. असे असतानाही शासनाने केवळ दारू दुकाने वाचविण्यासाठी हे राष्ट्रीय महामार्गदेखील नगरपालिकेच्या 16 वर्ष जुन्या ठरावाच्या आधारे अवर्गीकृत (मालकीत बदल) करून टाकल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करण्याचे अधिकार कुणाला आहेत?असे सरकारी वकिलांना विचारले. तर मग राज्य सरकारने मनपा चे म्हणणे न ऐकून घेता घाई घाईने हा निर्णय कसा घेतला ? या शब्दात शासनाला फटकारले.