शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

किसान रेल्वेच्या १०० फेऱ्यांमधून सहा कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक १७ हजार टन मालाची वाहतूक लोकमत ...

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

१७ हजार टन मालाची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतकरी बांधवांच्या कृषीमालाला इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये जादा भाव मिळून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून भुसावळ रेल्वे प्रशासनाला सहा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक या किसान रेल्वेद्वारे करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी ७ ऑगस्टपासून भारतातील पहिली किसान रेल्वे नाशिक स्टेशनजवळील देवळाली ते दानापूरदरम्यान धावली. या किसान रेल्वेमुळे भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ या भागांतील शेतकऱ्यांना बिहार राज्यातील दानापूरपर्यंत आपला भाजीपाला, फळे व इतर मालाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परराज्यात कांदा, लिंबू, द्राक्ष, पेरू , संत्री व इतर भाजीपाल्याला जास्त भाव मिळत असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरीबांधव या गाडीने परराज्यात आपल्या मालाची वाहतूक करीत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणाहून शेतकरी मालाची वाहतूक करतील, त्या ठिकाणच्या जवळील रेल्वेस्टेशनवरही ही किसान रेल्वे पाठविण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच खासगी वाहतुकीपेक्षा अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होत असल्याने शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाडीला मिळत आहे.

इन्फो :

आतापर्यंत १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

या किसान रेल्वे मालगाडीच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत या मालगाडीच्या माध्यमातून विविध भागातील शेतकऱ्यांनी १७ हजार ३३ टन इतक्या कृषी मालाची वाहतूक केली आहे. यातून रेल्वे प्रशासनाला ५ कोटी ९७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, या गाडीने नाशिक स्टेशनवरून सर्वाधिक कृषी मालाची वाहतूक झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज सेवा असल्यास शेतकऱ्यांचा फायदा

रेल्वे प्रशासनातर्फे गेल्यावर्षी कोरोनाकाळात सुरू केलेली ही किसान एक्सप्रेस सध्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीनच दिवशी धावत आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांना पुरेशी मालाची वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. जर रेल्वे प्रशासनाने दररोज किसान रेल्वेची सेवा सुरू ठेवली तर उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.