शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल्वेच्या १०० फेऱ्यांमधून सहा कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक १७ हजार टन मालाची वाहतूक लोकमत ...

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

१७ हजार टन मालाची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतकरी बांधवांच्या कृषीमालाला इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये जादा भाव मिळून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून भुसावळ रेल्वे प्रशासनाला सहा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक या किसान रेल्वेद्वारे करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी ७ ऑगस्टपासून भारतातील पहिली किसान रेल्वे नाशिक स्टेशनजवळील देवळाली ते दानापूरदरम्यान धावली. या किसान रेल्वेमुळे भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ या भागांतील शेतकऱ्यांना बिहार राज्यातील दानापूरपर्यंत आपला भाजीपाला, फळे व इतर मालाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परराज्यात कांदा, लिंबू, द्राक्ष, पेरू , संत्री व इतर भाजीपाल्याला जास्त भाव मिळत असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरीबांधव या गाडीने परराज्यात आपल्या मालाची वाहतूक करीत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणाहून शेतकरी मालाची वाहतूक करतील, त्या ठिकाणच्या जवळील रेल्वेस्टेशनवरही ही किसान रेल्वे पाठविण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच खासगी वाहतुकीपेक्षा अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होत असल्याने शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाडीला मिळत आहे.

इन्फो :

आतापर्यंत १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

या किसान रेल्वे मालगाडीच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत या मालगाडीच्या माध्यमातून विविध भागातील शेतकऱ्यांनी १७ हजार ३३ टन इतक्या कृषी मालाची वाहतूक केली आहे. यातून रेल्वे प्रशासनाला ५ कोटी ९७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, या गाडीने नाशिक स्टेशनवरून सर्वाधिक कृषी मालाची वाहतूक झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज सेवा असल्यास शेतकऱ्यांचा फायदा

रेल्वे प्रशासनातर्फे गेल्यावर्षी कोरोनाकाळात सुरू केलेली ही किसान एक्सप्रेस सध्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीनच दिवशी धावत आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांना पुरेशी मालाची वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. जर रेल्वे प्रशासनाने दररोज किसान रेल्वेची सेवा सुरू ठेवली तर उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.