शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

५२१ पाणी नमुन्यात आढळले नायट्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 23:52 IST

धोकादायक : १८ ठिकाणी फ्लोराईडचे प्रमाण, मानवी हस्तक्षेपामुळे होतेय वाढ

जळगाव : जलस्त्रोतांजवळ अस्वच्छता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही प्रक्रियेद्वारे ते नष्ट होऊ शकत नसल्याने हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १८ पाणी नमुन्यांमध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आले आहे.वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. यामध्ये उन्हाळा, पावसाळा अशा वेगवेगळ््या ऋतूमध्ये पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी जास्त होत असते. मात्र यात धोक्याची घंटा आहे ती नायट्रेटच्या प्रमाणाची. मानवी हस्तक्षेप वाढलापाण्यामध्ये इतर घटकांचे प्रमाण कमी जास्त होते ते नैसर्गिक कारणांमुळे. मात्र नायट्रेट हे नैसर्गिकरीत्या पाण्यात वाढू शकत नाही. याला मुख्य कारण आहे मानवी हस्ताक्षेपाचे. पाण्याच्या स्त्रोताजवळ हस्तक्षेप             वाढल्याने अस्वच्छता वाढते व नायट्रेटचे प्रमाण वाढते. फ्लोराईडचे १८ नमुने४जिल्ह्यात १८ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आहे. पाण्यामध्ये १.५ मिलीग्रॅम प्रतिलीटर एवढे प्रमाण स्वीकार्य आहे. मात्र या १८ ठिकाणी यापेक्षा जास्त प्रमाण आढळून आले आहे. जळगाव शहरात मात्र हे प्रमाण वाढलेले नाही. फ्लोराईडचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास दातांचे व हाडांचे विकार होतात. रक्ताभिसरणाचे आजारनायट्रेटचे प्रमाण वाढल्यास ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही तसेच रक्ताभिसरणाचे आजार वाढतात. धोका टाळण्यासाठी तपासणी कराजळगाव येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्हाभरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत असून यासाठी जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी कार्यालयात आणावे.अस्वच्छतेमुळे नायट्रेटचे वाढते प्रमाणपाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते ते अस्वच्छता व रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे. जिल्ह्यातील तब्बल ५२१ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींजवळ शेणाचे खड्डे करणे, कपडे धुणे, सांडपाणी सोडणे असे अस्वच्छतेचे कारणे आहेत. यात सर्वात धोकेदायक ठरतात ते शेणाचे खड्डे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात शेण हे विहिंरीजवळ टाकले जाते. कोणत्याही प्रक्रियेने नायट्रेट निघत नाहीपाण्यातील सर्व घटक शुद्धीकरण व इतर प्रक्रियेद्वारे निघू शकतात. मात्र नायट्रेट हे शासकीय जलशुद्धीकरण यंत्रणा असो वा घरगुती आरओ असो, या कशामुळे नायट्रेट नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचेच प्रमाण पाण्यामध्ये जास्त आहे. पाण्यात आढळून आलेले घटकजिल्ह्यात ५०२३ पाण्याचे नमुने घेण्यात येतात. यातील १५७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० ठिकाणी विद्राव्य क्षार (टीडीएस), ५२१ ठिकाणी नायट्रेट, १११ ठिकाणी आयर्न, १८ ठिकाणी फ्लोराईड, २९ ठिकाणी आम्लता (अल्कलीन), २८ ठिकाणी पीच आणि एका ठिकाणी गढूळपणा (टर्बिनिटी) आढळून आले. ५२१ ठिकाणी धोक्याच्या पातळीवरपाण्यामध्ये कोणते घटक किती पर्यंत असावे याची एक स्वीकार्य मर्यादा असते. मात्र नायट्रेटच्या बाबतीत तसे नाही. त्याचे थोडेही प्रमाण स्वीकार्य नसते. असे असताना जिल्ह्यातील ५२१ पाणी नमुन्यांमध्ये प्रति लीटर ४५ मिलीग्रॅमच्यावर नायट्रेट आढळून आले आहे.