शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५२१ पाणी नमुन्यात आढळले नायट्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 23:52 IST

धोकादायक : १८ ठिकाणी फ्लोराईडचे प्रमाण, मानवी हस्तक्षेपामुळे होतेय वाढ

जळगाव : जलस्त्रोतांजवळ अस्वच्छता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही प्रक्रियेद्वारे ते नष्ट होऊ शकत नसल्याने हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १८ पाणी नमुन्यांमध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आले आहे.वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. यामध्ये उन्हाळा, पावसाळा अशा वेगवेगळ््या ऋतूमध्ये पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी जास्त होत असते. मात्र यात धोक्याची घंटा आहे ती नायट्रेटच्या प्रमाणाची. मानवी हस्तक्षेप वाढलापाण्यामध्ये इतर घटकांचे प्रमाण कमी जास्त होते ते नैसर्गिक कारणांमुळे. मात्र नायट्रेट हे नैसर्गिकरीत्या पाण्यात वाढू शकत नाही. याला मुख्य कारण आहे मानवी हस्ताक्षेपाचे. पाण्याच्या स्त्रोताजवळ हस्तक्षेप             वाढल्याने अस्वच्छता वाढते व नायट्रेटचे प्रमाण वाढते. फ्लोराईडचे १८ नमुने४जिल्ह्यात १८ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आहे. पाण्यामध्ये १.५ मिलीग्रॅम प्रतिलीटर एवढे प्रमाण स्वीकार्य आहे. मात्र या १८ ठिकाणी यापेक्षा जास्त प्रमाण आढळून आले आहे. जळगाव शहरात मात्र हे प्रमाण वाढलेले नाही. फ्लोराईडचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास दातांचे व हाडांचे विकार होतात. रक्ताभिसरणाचे आजारनायट्रेटचे प्रमाण वाढल्यास ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही तसेच रक्ताभिसरणाचे आजार वाढतात. धोका टाळण्यासाठी तपासणी कराजळगाव येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्हाभरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत असून यासाठी जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी कार्यालयात आणावे.अस्वच्छतेमुळे नायट्रेटचे वाढते प्रमाणपाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते ते अस्वच्छता व रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे. जिल्ह्यातील तब्बल ५२१ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींजवळ शेणाचे खड्डे करणे, कपडे धुणे, सांडपाणी सोडणे असे अस्वच्छतेचे कारणे आहेत. यात सर्वात धोकेदायक ठरतात ते शेणाचे खड्डे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात शेण हे विहिंरीजवळ टाकले जाते. कोणत्याही प्रक्रियेने नायट्रेट निघत नाहीपाण्यातील सर्व घटक शुद्धीकरण व इतर प्रक्रियेद्वारे निघू शकतात. मात्र नायट्रेट हे शासकीय जलशुद्धीकरण यंत्रणा असो वा घरगुती आरओ असो, या कशामुळे नायट्रेट नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचेच प्रमाण पाण्यामध्ये जास्त आहे. पाण्यात आढळून आलेले घटकजिल्ह्यात ५०२३ पाण्याचे नमुने घेण्यात येतात. यातील १५७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० ठिकाणी विद्राव्य क्षार (टीडीएस), ५२१ ठिकाणी नायट्रेट, १११ ठिकाणी आयर्न, १८ ठिकाणी फ्लोराईड, २९ ठिकाणी आम्लता (अल्कलीन), २८ ठिकाणी पीच आणि एका ठिकाणी गढूळपणा (टर्बिनिटी) आढळून आले. ५२१ ठिकाणी धोक्याच्या पातळीवरपाण्यामध्ये कोणते घटक किती पर्यंत असावे याची एक स्वीकार्य मर्यादा असते. मात्र नायट्रेटच्या बाबतीत तसे नाही. त्याचे थोडेही प्रमाण स्वीकार्य नसते. असे असताना जिल्ह्यातील ५२१ पाणी नमुन्यांमध्ये प्रति लीटर ४५ मिलीग्रॅमच्यावर नायट्रेट आढळून आले आहे.