शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध काळात नियम तोडणाऱ्यांकडून ५१ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

४८२ दुकाने केली सील : मास्क न वापरणाऱ्या चार हजारांहून अधिक नागरिकांवर दंड ; मनपाकडून करण्यात आलेली कारवाई कारवाई ...

४८२ दुकाने केली सील : मास्क न वापरणाऱ्या चार हजारांहून अधिक नागरिकांवर दंड ;

मनपाकडून करण्यात आलेली कारवाई

कारवाई - संख्या - वसुली

मास्क न लावणारे - ४,३१८ - १७ लाख ४ हजार ४००

लपून छपून व्यवसाय करणे - ५९६ - ३१ लाख ७९ हजार ५००

वाहनधारक -१९२ - १ लाख ३७ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने शहरभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंध काळातदेखील नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांकडून मनपा प्रशासनाने तब्बल ५१ लाखांची वसुली केली आहे, तर शहरातील ४८२ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनपा प्रशासनाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपायुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवरदेखील कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच निर्बंध काळात मास्क न लावणाऱ्यांवरदेखील मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने मास्क न लावणाऱ्या ४ हजार ३१८ नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

५० जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे

निर्बंध काळात लग्न असो वा अंत्यसंस्कार याबाबत जिल्हा प्रशासनाने उपस्थितांची संख्या निर्धारित केली होती.मात्र, शहरातील अनेक ठिकाणे लग्न समारंभामध्ये जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाली होती. याबाबत मनपा प्रशासनाकडून सहा मंगल कार्यालय सील करण्यात आली होती, तर नियम मोडणाऱ्या ५० जणांवर मनपा प्रशासनाने निर्बंध काळात गुन्हेदेखील दाखल केले आहेत. काही ठिकाणी कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व भाजीपाला विक्रेत्यांमध्येदेखील वाद झाल्याने हा वाद खेड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. या वादा दरम्यानदेखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले.

४८२ दुकाने झाली सील, ११२ वाहनधारकांवर करण्यात आली कारवाई

कोरोना काळात मनपा प्रशासनाने शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या काळातदेखील अनेक विक्रेत्यांनी लपून छपून व्यवसाय केल्याचे आढळून आले, तर काही दुकानदारांनी आपला दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर ग्राहकांची गर्दी केल्यामुळे मनपा प्रशासनाकडून ५९६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ४८२ दुकानदारांची दुकाने सील करण्यात आली. तसेच या काळात नियम मोडणार्‍या वाहनधारकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडूनदेखील एक लाख रुपयांची वसुली करण्यात आली.