शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

निर्बंध काळात नियम तोडणाऱ्यांकडून ५१ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

४८२ दुकाने केली सील : मास्क न वापरणाऱ्या चार हजारांहून अधिक नागरिकांवर दंड ; मनपाकडून करण्यात आलेली कारवाई कारवाई ...

४८२ दुकाने केली सील : मास्क न वापरणाऱ्या चार हजारांहून अधिक नागरिकांवर दंड ;

मनपाकडून करण्यात आलेली कारवाई

कारवाई - संख्या - वसुली

मास्क न लावणारे - ४,३१८ - १७ लाख ४ हजार ४००

लपून छपून व्यवसाय करणे - ५९६ - ३१ लाख ७९ हजार ५००

वाहनधारक -१९२ - १ लाख ३७ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने शहरभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंध काळातदेखील नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांकडून मनपा प्रशासनाने तब्बल ५१ लाखांची वसुली केली आहे, तर शहरातील ४८२ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनपा प्रशासनाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपायुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवरदेखील कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच निर्बंध काळात मास्क न लावणाऱ्यांवरदेखील मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने मास्क न लावणाऱ्या ४ हजार ३१८ नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

५० जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे

निर्बंध काळात लग्न असो वा अंत्यसंस्कार याबाबत जिल्हा प्रशासनाने उपस्थितांची संख्या निर्धारित केली होती.मात्र, शहरातील अनेक ठिकाणे लग्न समारंभामध्ये जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाली होती. याबाबत मनपा प्रशासनाकडून सहा मंगल कार्यालय सील करण्यात आली होती, तर नियम मोडणाऱ्या ५० जणांवर मनपा प्रशासनाने निर्बंध काळात गुन्हेदेखील दाखल केले आहेत. काही ठिकाणी कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व भाजीपाला विक्रेत्यांमध्येदेखील वाद झाल्याने हा वाद खेड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. या वादा दरम्यानदेखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले.

४८२ दुकाने झाली सील, ११२ वाहनधारकांवर करण्यात आली कारवाई

कोरोना काळात मनपा प्रशासनाने शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या काळातदेखील अनेक विक्रेत्यांनी लपून छपून व्यवसाय केल्याचे आढळून आले, तर काही दुकानदारांनी आपला दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर ग्राहकांची गर्दी केल्यामुळे मनपा प्रशासनाकडून ५९६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ४८२ दुकानदारांची दुकाने सील करण्यात आली. तसेच या काळात नियम मोडणार्‍या वाहनधारकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडूनदेखील एक लाख रुपयांची वसुली करण्यात आली.