शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

स्वेच्छानिवृत्तीसाठी ५० कर्मचाऱ्यांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव ...

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी `स्वेच्छानिवृत्ती`ची योजना आणली असून, या योजनेसाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून ५० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. कर्मचाऱ्यांचे हे अर्ज जळगाव विभागातर्फे महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्ता दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार असून, नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत, अशा कर्मचाऱ्यांकडून महामंडळातर्फे स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव आगारातील आतापर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी हे संमतीपत्र भरून, स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील दीड हजारांहून अधिक कर्मचारी असताना, बोटावर मोजण्याइतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

इन्फो :

ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले होते, त्या कर्मचाऱ्यांचे अर्ज महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तर मध्यवर्ती कार्यालयाकडूनही मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यावर अद्याप शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- प्रशांत महाजन, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी महामंडळ