शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळातही कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

खबरदारी : फेऱ्या कमी झाल्यामुळे चालक-वाचकांनाही सवलत लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने ...

खबरदारी : फेऱ्या कमी झाल्यामुळे चालक-वाचकांनाही सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातही प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती करण्यात आली असून, दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील चालक- वाहकांना फेऱ्या कमी झाल्यामुळे आळीपाळीने कामावर बोलावण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे हजारोंच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेशच दिले आहेत. सध्या कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ‘मिशन बिगीन अंतर्गत’ राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

शासनाच्या या निर्णयानुसार महामंडळाच्या जळगाव विभागात सर्व प्रशासकीय विभागांमध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची १ एप्रिलपासून ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय विभागातही ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थित अनिवार्य असेल, त्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित विभाग प्रमुखांना आदेश देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

चालक- वाहकांचीही ५० टक्के उपस्थिती

महामंडळातील चालक, वाहक, वाहतूक विभागातील कर्मचारी व तांत्रिक विभागातील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत मोडले जातात. त्यांना कुठल्याही अडचणीच्या काळात सेवा बजावण्यासाठी नित्य नियमाने यावे लागते. मात्र, आता कोरोनामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, त्यामुळे दैनंदिन फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या अत्यावश्यक मार्गावरच फेऱ्या सुरू असून, या ठिकाणी आळीपाळीने ५० टक्केच चालक-वाहकांना कामावर बोलावून सेवा बजाविण्यात येत असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यानी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.