शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

४५ कोटींचा रस्त्यांचा ठराव रद्द करून नव्याने ७० कोटींचा ठराव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांचे काम प्राधान्याने घेण्यात यावे यासाठी खलबतं सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ४५ कोटींच्या मनपा फंडातून शहरातील रस्त्यांच्या होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक रद्द करून, आता नव्याने २५ कोटींची भर टाकून ७० कोटींच्या कामांचे नवीन अंदाजपत्रक आता तयार केले जाणार आहे.

अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. त्यातच मनपाकडून रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली जात असल्याने रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. अशा परिस्थितीत आता अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे तर भुयारी गटार योजनेचे कामदेखील वेगात सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्याचा मार्ग जवळपास मार्गी लागणार आहेत.

एकाच रस्त्यांचे अनेक निधीतून प्रस्ताव

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचे प्रस्ताव तयार करताना, एकाच रस्त्याचे प्रस्ताव नगरोत्थांतर्गत निधीतून व मनपा फंडातील निधीतून देखील केले आहेत. त्यामुळे ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचे प्रस्ताव जे नगरोत्थांतर्गत होणाऱ्या कामात आहेत. ते प्रस्ताव आता कमी केले जाणार आहे. त्यातच मनपा फंडातील ४५ कोटींच्या कामांमध्ये २५ कोटींचा निधीची वाढ करून, एकूण ७० कोटींच्या रस्त्यांचा कामांचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेला ३१५ क्रमांकांचा ठरावदेखील रद्द करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

४२ कोटींसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार होणार

नगरोत्थान अंतर्गत मनपाला प्राप्त झालेल्या मात्र सध्य:स्थितीत नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबतदेखील अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग अजून खडतर झाला आहे. दरम्यान, या निधीतून कामांसाठी करण्यात आलेले अंदाजपत्रक नव्याने करण्याबाबत मनपा स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात २ कोटींची कामे देण्याबाबत शिवसेना नगरसेवक आक्रमक आहेत. याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे देखील काही नगरसेवकांनी तक्रारी केल्या असून, या निधीबाबत नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याची मागणी केली आहे.

निधीचे ठराव कोट्यवधीचे अंमलबजावणी मात्र कधी

शहरातील खराब रस्त्यांमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. मनपातील सत्ताधारी जळगावकरांना सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच अडीच वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून १०० कोटी, ४५ कोटी अशा कोट्यवधीच्या निधीतून होणाऱ्या कामांचे ठराव केले जात आहेत. मात्र, अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे जळगावकरांना या कोट्यवधींच्या घोषणांचीही चीड येत आहे. आता ‘अमृत’चे काम अनेक भागांत पूर्ण झाले आहे. या भागात तरी रस्त्यांची कामे करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.