शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४५ कोटींचा रस्त्यांचा ठराव रद्द करून नव्याने ७० कोटींचा ठराव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून, आता सत्ताधाऱ्यांविरोधात जनमानसांत संतापाची लाट आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांचे काम प्राधान्याने घेण्यात यावे यासाठी खलबतं सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ४५ कोटींच्या मनपा फंडातून शहरातील रस्त्यांच्या होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक रद्द करून, आता नव्याने २५ कोटींची भर टाकून ७० कोटींच्या कामांचे नवीन अंदाजपत्रक आता तयार केले जाणार आहे.

अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. त्यातच मनपाकडून रस्त्यांची थातूर-मातूर दुरूस्ती केली जात असल्याने रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. अशा परिस्थितीत आता अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे तर भुयारी गटार योजनेचे कामदेखील वेगात सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्याचा मार्ग जवळपास मार्गी लागणार आहेत.

एकाच रस्त्यांचे अनेक निधीतून प्रस्ताव

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांचे प्रस्ताव तयार करताना, एकाच रस्त्याचे प्रस्ताव नगरोत्थांतर्गत निधीतून व मनपा फंडातील निधीतून देखील केले आहेत. त्यामुळे ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचे प्रस्ताव जे नगरोत्थांतर्गत होणाऱ्या कामात आहेत. ते प्रस्ताव आता कमी केले जाणार आहे. त्यातच मनपा फंडातील ४५ कोटींच्या कामांमध्ये २५ कोटींचा निधीची वाढ करून, एकूण ७० कोटींच्या रस्त्यांचा कामांचा प्रस्ताव येत्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेला ३१५ क्रमांकांचा ठरावदेखील रद्द करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

४२ कोटींसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार होणार

नगरोत्थान अंतर्गत मनपाला प्राप्त झालेल्या मात्र सध्य:स्थितीत नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबतदेखील अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग अजून खडतर झाला आहे. दरम्यान, या निधीतून कामांसाठी करण्यात आलेले अंदाजपत्रक नव्याने करण्याबाबत मनपा स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात २ कोटींची कामे देण्याबाबत शिवसेना नगरसेवक आक्रमक आहेत. याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे देखील काही नगरसेवकांनी तक्रारी केल्या असून, या निधीबाबत नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याची मागणी केली आहे.

निधीचे ठराव कोट्यवधीचे अंमलबजावणी मात्र कधी

शहरातील खराब रस्त्यांमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. मनपातील सत्ताधारी जळगावकरांना सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच अडीच वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून १०० कोटी, ४५ कोटी अशा कोट्यवधीच्या निधीतून होणाऱ्या कामांचे ठराव केले जात आहेत. मात्र, अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे जळगावकरांना या कोट्यवधींच्या घोषणांचीही चीड येत आहे. आता ‘अमृत’चे काम अनेक भागांत पूर्ण झाले आहे. या भागात तरी रस्त्यांची कामे करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.