शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सफाई ठेक्यांमध्ये दरमहा ४४ लाखांचा अपहार

By admin | Updated: July 10, 2017 00:43 IST

अश्विनी देशमुख यांचा आरोप : आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाºयांवर गुन्हे दाखलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मनपाच्या सफाई ठेक्यांमध्ये दरमहा सुमारे ४४ लाखांचा अपहार   होत असून ही रक्कम मक्तेदार,                 तसेच आयुक्त, उपायुक्त, आरोग्याधिकाºयांसह कर्मचारी वाटून घेत असल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी देशमुख व त्यांचे पती विनोद देशमुख यांनी रविवारी, सकाळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत केला. याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असून प्रभाग ३६ मधील ठेक्यात भागीदार असलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना अपात्र ठरविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.निवडणूक लढायचीय, पैसे कमवाप्रभाग ३६ मधील सफाईचा मक्ता ‘सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था’ या नावाने घेण्यात आला आहे. त्यात भाजपाच्या नगरसेविका व माजी स्थायी समिती ज्योती चव्हाण व त्यांचे पती मनपा कर्मचारी असलेले बाळासाहेब चव्हाण हे देखील सफाई मक्त्यात भागीदार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.प्रभागात सफाई होत नसल्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्याने प्रारंभी मक्तेदारांकडून आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांच्यामार्फत तसेच आरोग्य निरीक्षकांमार्फत पैसे घेऊन तक्रारी न करण्याच्या तोंडी आॅफर आल्या. मात्र याबाबत तक्रार करावयाची तर पुरावे हवेत म्हणून सकारात्मकता दाखवित बैठकीस जाण्याचे मान्य केले. नगरसेविका ज्योती चव्हाण यांच्या घरी पहिली बैठक झाली. त्यात त्यांनी तसेच त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी निवडणुकीला १८ महिने राहिलेत. आपल्यालाही पैसे लागणार आहेत. पैसे कमवा असे सुचविले. तर विनोद देशमुख यांनी माजी नगरसेवक पिंटू जाधव, तसेच नितीन सपके आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. याचा अर्ज आयुक्तांना दिला असल्याचे सांगितले. त्यावर ज्योती चव्हाण यांनी मी त्यांना धमक्या देणे बंद करण्यास सांगते, असे सांगितले. त्यावेळी बाळासाहेब चव्हाण यांनी १५ हजार रूपये दरमहा घरपोच आणून देण्याची जबाबदारी उचलतो, अशी आॅफर दिली. याबाबतची व्हीडीओ क्लीपही देशमुख यांनी पत्रपरिषदेत   दाखविली. दंड करायला लावायचे नाटक करायाच व्हीडीओ क्लीपमध्ये आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील प्रभाग २९ चा ठेका चव्हाण यांचा असल्याचे निर्देशित करीत मी यांना सांगितले की, मला बोलवायचे, चार लोकांसमोर दंड करायला लावायचे, असे सांगताना दिसतात. म्हणजेच लोकांसमोर दंड करायचे नाटक करावयाचे व नंतर तो दंड रद्द करून टाकायचा, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. आयुक्त, उपायुक्तही सहभागीआरोग्यच्या सफाई ठेक्यातील गैरव्यवहारात तत्कालीन आयुक्त तसेच विद्यमान उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील तसेच आरोग्य निरीक्षक व कर्मचाºयांनी सफाई मक्तेदारांशी हातमिळविणी केलेली आहे. आरोग्याधिकारी एका व्हीडीओ क्लीपमध्ये आयुक्तांबद्दल ‘साहेब खुप हुशार आहेत. ते म्हणतात तुम्ही मिटींग करा व तेथेच निर्णय घ्या’ असे म्हणताना दिसतात. तर               उपायुक्त कहार यांच्याशी तर आरोग्याधिकाºयांनी त्यांच्या मोबाईलवरूनच बोलणे करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यात उपायुक्तांनी देशमुख यांना ‘तुम्ही जरी पुराव्यासह तक्रारी केल्या असल्या तरी त्या तक्रारी आम्ही नाकारू शकतो. तुम्ही कशाला विरोधात जाताय? जसे चालले आहे तसेच चालू द्या, बाकी आरोग्याधिकारी तुम्हाला सांगतील, असे सांगितल्याचा दावा केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन नगरसेविका देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे सहजीवन स्वयंरोजगार संस्थेचे सदस्य आरोग्याधिकाºयांच्या घरी झालेल्या एका बैठकीत आले होते. त्यात आरोग्याधिकारी त्यांना दरमहा दहा हजार रूपये देशमुख यांना देण्याची सूचना करताना दिसतात. मात्र संबंधीतांकडून कुठेही ही रक्कम जास्त होते, असा उल्लेख नाही. याचाच अर्थ आम्ही मागणी केली नव्हती, हे स्पष्ट होते. त्याउलट आरोग्याधिकारी त्यांना ३० हजार रूपयांनी कमी रक्कमेचा मक्ता का घेतला. मला विचारायला हवे होते.आता दंड कमी करून प्रॉफीट वाढवून देतो, असे स्पष्टपणे सांगताना व्हीडीओ क्लीपमध्ये दिसून येत असल्याचे सांगितले. अधिकारी, कर्मचाºयांच्या निलंबनाची मागणीया घोटाळ्यात तत्कालीन आयुक्तांसह उपायुक्त, आरोग्याधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग असून आयुक्त सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखावे व अन्य अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी देशमुख यांनी केली. तसेच प्रभाग ३६ चा सफाई मक्ता रद्द करण्याची मागणी केली. ८० हजाराऐवजी जेमतेम ४-५ हजाराचा दंडप्रभाग ३६ मधील सफाईबाबत ३५०० तक्रारी केल्या होत्या. प्रशासनाच्या टिपणीतच प्रभाग ३६ चा मक्ता रद्द करण्याची कारणे देताना ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा न करणे तसेच इतर बाबींचा उल्लेख केलेला आहे. करारनाम्यात नमूद केल्यानुसार त्यासाठी दरमहा किमान ८० हजार रूपये दंड होणे अपेक्षित असताना किरकोळ दंड केला आहे. देशमुख यांनी केलेल्या ३५०० तक्रारींपैकी १५०० तक्रारी गायब करून टाकल्या. तरीही उर्वरीत तक्रारींपोटी किमान ७-८ लाखांचा दंड करणे अपेक्षित असताना तसे घडलेले नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.