शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

‘स्वेच्छानिवृत्ती’साठी ४४ कर्मचाऱ्यांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली असून, यासाठी महामंडळाच्या जळगाव ...

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली असून, यासाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून फक्त ४४ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आहेत. सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील १ हजार २७१ कर्मचारी असताना बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

महामंडळातर्फे गेल्या महिन्यापासून ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्त्यासह प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेतले जात आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

इन्फो :

...तर योजनेमुळे नुकसान

महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या महामंडळात ५० वय पूर्ण केलेले कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार ५० हजार रुपये पगार घेत आहेत. वर्षाला यातून ६ लाख रुपये उत्पन्न होते. मात्र, जर या स्वेच्छानिवृत्ती योजनुसार निवृत्ती घेतली तर प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचेच वेतन मिळणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.