शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

‘स्वेच्छानिवृत्ती’साठी ४४ कर्मचाऱ्यांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली असून, यासाठी महामंडळाच्या जळगाव ...

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली असून, यासाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून फक्त ४४ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आहेत. सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील १ हजार २७१ कर्मचारी असताना बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

महामंडळातर्फे गेल्या महिन्यापासून ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्त्यासह प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेतले जात आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

इन्फो :

...तर योजनेमुळे नुकसान

महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या महामंडळात ५० वय पूर्ण केलेले कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार ५० हजार रुपये पगार घेत आहेत. वर्षाला यातून ६ लाख रुपये उत्पन्न होते. मात्र, जर या स्वेच्छानिवृत्ती योजनुसार निवृत्ती घेतली तर प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचेच वेतन मिळणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.