शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४३ टीएमसी पाणी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्यातील धरणांमध्ये २३ जूनअखेर ४३ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गिरणा, वाघूर आणि हतनूर या मोठ्या ...

जळगाव : जिल्ह्यातील धरणांमध्ये २३ जूनअखेर ४३ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गिरणा, वाघूर आणि हतनूर या मोठ्या प्रकल्पांमध्ये ३६, तर इतर मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सात टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

जून महिन्याच्या सरासरीपेक्षा आतापर्यंत फक्त ६८ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यात धरणांमधील साठ्यावरदेखील परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरात झालेल्या पावसाचा फायदा गिरणा धरणाला होतो. या धरणात १८.४८ टीएमसी पाणी साठा आहे, तर मध्य प्रदेशात झालेल्या पावसाचा फायदा हा तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाला होतो. त्यामुळे या धरणात ९ टीएमसी पाणी आहे. जिल्ह्यात आणि अजिंठा डोंगररांगांमध्ये आतापर्यंत पुरेसा पाऊस झालेला नसल्याने वाघूर धरणात ८.७७ टीएमसी पाणी आहे. गत वर्षापेक्षा यंदा या धरणांमध्ये २३ जुलैपर्यंतचा हा साठा जास्त आहे.

पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचे आवाहन

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता ‌वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी एवढा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कमी पाऊस असताना पेरणी केल्यास अपुऱ्या ओलाव्यामुळे पेरणी वाया जाऊ शकते व दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.