शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील ३७ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव ...

रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान

जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता मोहीम राबवून, स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्टेशनवर ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : जळगाव आगारातून शेगाव येथे स्वतंत्र बससेवा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातून हजारो भाविक येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र, बससेवा नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : महामंडळातर्फे टप्प्याटप्प्याने सर्व शहरातील बससेवा सुरू करण्यात येत असली तरी, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही पुरेशी सुरू झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व गावांची बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नवीन वर्षातही पॅसेंजर सुरू न झाल्याने नाराजी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर रद्द आहेत. यामुळे प्रवासी व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तर, रेल्वेतर्फे १ जानेवारीपासून पॅसेंजर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या पॅसेंजर सुरू न झाल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रॅम्प सुरू करण्याची मागणी

जळगाव : जळगाव रेल्वेस्टेशनवरील रॅम्पचे काम सहा महिन्यांपासून पूर्ण झाले आहे. या रॅम्पमुळे दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना स्टेशनमध्ये जाणे सोयीचे होणार आहे. तरी, रेल्वे प्रशासनाने तत्काळ रॅम्प सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

जिल्हा परिषदेसमोर वाहतूककोंडी

जळगाव : टाॅवर चौकाकडून जुन्या जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सायंकाळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, परिणामी यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे. यावर उपाय म्हणून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.