शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजार शेतकऱ्यांना ३५६ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:03 IST

रक्कम खात्यावर जमा झाल्याचा जिल्हा बँकेचा दावा

ठळक मुद्दे राष्टÑीयकृत बँकांकडून मात्र आदेश धाब्यावर सर्व विकासोंचे तक्ते मंजूर राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटप

जळगाव: जिल्हा बँकेकडून दरवर्षी खरीप हंगामासाठी सरासरी हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटप केले जात असताना यंदा मात्र जूनचा आठवडा उलटला तरीही ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाख ६४ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावरही जमा झाली असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या सूत्रांनी केला आहे.दरम्यान, राष्टÑीयकृत बँकांनी मात्र मुख्यमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही धाब्यावर बसविले असून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविली आहे. ४ जून पर्यंत जेमतेम ३ टक्केच कर्जवाटप केले असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना मात्र नाईलाजाने सावकाराची पायरी चढायची वेळ आली आहे.खरीप हंगाम सुरू होऊनही विविधकार्यकारीसोसायट्यांकडून कर्जमंजुरी तक्तेच जिल्हा बँकेकडे वेळेत सादर झालेले नसल्याने पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याची तक्रार होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्जही मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. याबाबत शेतकरी आंदोलन कृती समितीतर्फे मंगळवार, ५ जून रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन तक्रारही करण्यात आली होती. पेरणीचे दिवस असल्याने बियाणे, खते, पेरणीसाठी शेतकºयांना पैशांची तातडीने गरज आहे. असे असताना जिल्हा बँक व राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्हा बँकेकडून माहिती घेतली असता ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाखांचे कर्ज वाटप झाले असून ते त्यांच्या खात्यातही जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.सर्व विकासोंचे तक्ते मंजूरजिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांचे कर्ज तक्ते मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही बँकेच्या सूत्रांनी दिली.राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटपराष्टÑीयकृत बँकांनी मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही खरीप हंगामासाठी १० हजाराचे तातडीचे कर्ज वाटप केले नव्हते. यंदाही राष्टÑीयकृतबँकांकडून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडे दर आठवड्याला याबाबत आढावा बैठक घेतली जात आहे. ४ जून रोजी झालेल्या बैठकीत राष्टÑीयकृत बँकांनी जिल्'ात जेमतेम ३ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या व त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या इशाºयानंतरही राष्टÑीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.