शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

४२ हजार शेतकऱ्यांना ३५६ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:03 IST

रक्कम खात्यावर जमा झाल्याचा जिल्हा बँकेचा दावा

ठळक मुद्दे राष्टÑीयकृत बँकांकडून मात्र आदेश धाब्यावर सर्व विकासोंचे तक्ते मंजूर राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटप

जळगाव: जिल्हा बँकेकडून दरवर्षी खरीप हंगामासाठी सरासरी हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटप केले जात असताना यंदा मात्र जूनचा आठवडा उलटला तरीही ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाख ६४ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावरही जमा झाली असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या सूत्रांनी केला आहे.दरम्यान, राष्टÑीयकृत बँकांनी मात्र मुख्यमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही धाब्यावर बसविले असून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविली आहे. ४ जून पर्यंत जेमतेम ३ टक्केच कर्जवाटप केले असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना मात्र नाईलाजाने सावकाराची पायरी चढायची वेळ आली आहे.खरीप हंगाम सुरू होऊनही विविधकार्यकारीसोसायट्यांकडून कर्जमंजुरी तक्तेच जिल्हा बँकेकडे वेळेत सादर झालेले नसल्याने पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याची तक्रार होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्जही मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. याबाबत शेतकरी आंदोलन कृती समितीतर्फे मंगळवार, ५ जून रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन तक्रारही करण्यात आली होती. पेरणीचे दिवस असल्याने बियाणे, खते, पेरणीसाठी शेतकºयांना पैशांची तातडीने गरज आहे. असे असताना जिल्हा बँक व राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्हा बँकेकडून माहिती घेतली असता ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाखांचे कर्ज वाटप झाले असून ते त्यांच्या खात्यातही जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.सर्व विकासोंचे तक्ते मंजूरजिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांचे कर्ज तक्ते मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही बँकेच्या सूत्रांनी दिली.राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटपराष्टÑीयकृत बँकांनी मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही खरीप हंगामासाठी १० हजाराचे तातडीचे कर्ज वाटप केले नव्हते. यंदाही राष्टÑीयकृतबँकांकडून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडे दर आठवड्याला याबाबत आढावा बैठक घेतली जात आहे. ४ जून रोजी झालेल्या बैठकीत राष्टÑीयकृत बँकांनी जिल्'ात जेमतेम ३ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या व त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या इशाºयानंतरही राष्टÑीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.