शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:31 IST

जळगाव  जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

ठळक मुद्दे ९०७ जणांविरुद्ध गुन्हे

जळगाव : जिल्ह्यात ४५ पतसंस्थांमध्ये तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी आतापर्यंत ९०७ जणांवर सहकार विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ६५० पतसंस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात विनातारण कर्ज, अनियमितता, गैरव्यवहार आदी कारणांमुळे काही पतसंस्थांची अवस्था अत्यंत बिकट झाली. त्यामुळे ४५ पतसंस्थांमधील ३५१ कोटी ८८ लाखांच्या रक्कमेच्या वसुलीसाठी तब्बल ९०७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार विभागाने २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण २५६६ कर्जदारांकडून २४ कोटी ७४ लाखांची वसुली केली. तसेच याच कालावधीत अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण १३५६४ ठेवीदारांना २३ कोटी ९३ लाख रक्कमेच्या ठेवींचे वाटप करण्यात आले. मात्र अडकलेल्या ठेवींच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. एकूण अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ७४ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेल्या आहेत. तर १०४ पतसंस्था अजूनही अडचणीत आहेत.पतपेढ्यांमधील घोळाबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांची सहकार कायद्यानुसार चौकशी करणे, मोठ्या कर्जदारांकडून वसुली करणे व वसुली न झाल्यास गुन्हे दाखल करणे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य असले तरीही सहकार विभाग व पतसंस्थांचे संचालक यांच्यात हातमिळवणी होत असल्यानेच कठोर कारवाई होत नसल्याचे आरोप ठेवीदारांकडून होत आहेत.पतसंस्थांमधील घोळ उघडकीस आल्याचे प्रकार घडल्यानंतर प्रशासन सतर्क असून नव्याने काही तक्रार आली तर लगेच टेस्ट आॅडीट केले जाते. मात्र नंतर असे प्रकार झालेले नाहीत. काही पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.-एम.यु.राठोड, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार