शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:31 IST

जळगाव  जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

ठळक मुद्दे ९०७ जणांविरुद्ध गुन्हे

जळगाव : जिल्ह्यात ४५ पतसंस्थांमध्ये तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी आतापर्यंत ९०७ जणांवर सहकार विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ६५० पतसंस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात विनातारण कर्ज, अनियमितता, गैरव्यवहार आदी कारणांमुळे काही पतसंस्थांची अवस्था अत्यंत बिकट झाली. त्यामुळे ४५ पतसंस्थांमधील ३५१ कोटी ८८ लाखांच्या रक्कमेच्या वसुलीसाठी तब्बल ९०७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार विभागाने २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण २५६६ कर्जदारांकडून २४ कोटी ७४ लाखांची वसुली केली. तसेच याच कालावधीत अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण १३५६४ ठेवीदारांना २३ कोटी ९३ लाख रक्कमेच्या ठेवींचे वाटप करण्यात आले. मात्र अडकलेल्या ठेवींच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. एकूण अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ७४ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेल्या आहेत. तर १०४ पतसंस्था अजूनही अडचणीत आहेत.पतपेढ्यांमधील घोळाबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांची सहकार कायद्यानुसार चौकशी करणे, मोठ्या कर्जदारांकडून वसुली करणे व वसुली न झाल्यास गुन्हे दाखल करणे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य असले तरीही सहकार विभाग व पतसंस्थांचे संचालक यांच्यात हातमिळवणी होत असल्यानेच कठोर कारवाई होत नसल्याचे आरोप ठेवीदारांकडून होत आहेत.पतसंस्थांमधील घोळ उघडकीस आल्याचे प्रकार घडल्यानंतर प्रशासन सतर्क असून नव्याने काही तक्रार आली तर लगेच टेस्ट आॅडीट केले जाते. मात्र नंतर असे प्रकार झालेले नाहीत. काही पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.-एम.यु.राठोड, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार