शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

पाच वर्षात 31 शेतक:यांनाच लाभ

By admin | Updated: December 1, 2015 00:39 IST

नंदुरबार : शेतक:यांसाठी असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नामकरण

नंदुरबार : शेतक:यांसाठी असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नामकरण करून एक लाखावरून दोन लाख रुपये विमा भरपाईची रक्कम करण्यात आली आहे. परंतु अनेक शेतक:यांना गेल्या अनेक वर्षापासून या योजनेची माहितीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात 64 शेतक:यांनीच दावे दाखल केले. त्यापैकी केवळ 31 जणांनाच विम्याची रक्कम मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे योजनेचे नाव बदलून आणि विम्याची रक्कम वाढवून उपयोग नाही, तर शेतक:यांमध्ये या योजनेची जागृती करणेही तेवढेच गरजेचे आहे.

शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांनी होणा:या अपघातांमुळे शेतक:यांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे कुटुंब उघडय़ावर येते; ही बाब लक्षात घेता शेतक:यांसाठी अर्थात ज्याच्या नावावर सातबारा उतारा आहे, अशा शेतक:यांसाठी शासनाने 2005 पासून शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्वित केली होती. या योजनेत पाच वर्षात बरेच बदल झाले. शिवाय शेतक:यांर्पयत या योजनेचे फायदे आणि मिळणारे लाभ याची माहिती पोहचविली गेली नाही. परिणामी शेतक:यांना या योजनेचा काहीएक उपयोग झाला नाही. पाच वर्षात जे दावे दाखल झाले ते अगदीच नगण्य असे होते. त्यातील निम्मे तर मंजूरच झाले नाहीत.

कशी आहे योजना..

शेतकरी अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा असे नामकरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतक:याच्या नावाचा सातबारा आहे, अशा 10 ते 75 वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील. शेतक:यांच्या अपघात विम्याची रक्कम शासन परस्पर भरेल. शेतक:यांनी यापूर्वी इतर कुठलेही विमे काढले असतील तरी त्याचा याला काही अडसर राहणार नाही.

केव्हा मिळेल फायदा

शेतक:याचा अपघातात मृत्यू झाल्यावर अर्थात रस्ता अपघात, वीज पडून, विजेचा शॉक, पूर, सर्पदंश यासह इतर अपघातांचा त्यात समावेश असेल. अपघाती मृत्यूला दोन लाख, अपघातात दोन डोळे निकामी झाल्यास दोन लाख, दोन अवयव, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख, तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी घटना घडल्यानंतर ठरावीक मुदतीत जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

यापूर्वी ही योजना 2005 पासून कार्यान्वित करण्यात आली होती. त्या वेळी योजनेचे नाव शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना असे होते. 2009-10 मध्ये योजनेचे पुन्हा नाव बदलण्यात येऊन शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. 2007-08 र्पयत या योजनेची अंमलबजावणी महसूल विभागामार्फत करण्यात आली. त्यानंतर 2008-09 पासून ही योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. आताही कृषी विभागच ही योजना राबविणार आहे.

अवघे 64 दावे

गेल्या पाच वर्षात अर्थात 2010-11 पासून तर 2015 र्पयत केवळ 64 जणांनी विम्यासाठी दावा दाखल केला होता. त्यापैकी केवळ 31 दावे मंजूर करण्यात आले. सर्वाधिक प्रकरणे 2010-11 व 2011-12 मध्ये होते. त्यानंतर प्रकरणांची संख्या कमी झाली. गेल्या वर्षी तर केवळ चारच दावे दाखल झाले होते.

जनजागृतीचा अभाव

या योजनेविषयी कृषी विभागाकडून जनजागृती होत नसल्यामुळे ही स्थिती आहे. अनेक शेतक:यांना अशा प्रकारची योजना असते किंवा आहे हेच माहिती नाही. त्यामुळे मोठय़ा अडचणी निर्माण होत असतात. आता शासनाने योजनेचे नाव लोकनेत्यांच्या नावाने केले आहे.

शिवाय विम्याची रक्कमही वाढविली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती होणे आवश्यक आहे. जेवढी जास्त जनजागृती होईल तेवढा फायदा सर्वसामान्य शेतक:यांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक:यांर्पयत ही योजना पोहचली पाहिजे या दृष्टीने प्रय} व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.