शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ३० हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:41 IST

आढावा बैठक

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सर्व विभागांकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविणे सुरू ७ दिवसांत मागविली माहिती

जळगाव- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ३० हजार अधिकारी व कर्मचाºयांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुखांकडून त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळाची माहितीमागविण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्केच माहिती मिळाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत आढावा बैठक होऊन उर्वरित माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली.लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला गती देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी व विविध पथकांसाठी एकूण ३० हजार मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राष्टÑीयकृत बँकांच्या विभाग प्रमुखांकडून त्यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागविली होती. ही माहिती तालुकास्तरावर संकलीत होऊन जिल्ह्याला एनआयसीत एकत्रित केली जात आहे. या माहिती संकलनासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची नोडल आॅफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.७ दिवसांत मागविली माहितीआतापर्यंत ५० टक्केच माहिती प्राप्त झाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत बैठक झाली. त्यास निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, एनआयसीचे प्रमोद बोराले, पत्की, नोडल आॅफीसर उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे , तहसीलदार अमोल निकम तसेच माहिती सादर न केलेल्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात उर्वरीत माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली आहे.