शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत सहभागी होणार ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:42 IST

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. 

ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत प्रतिभा शिंदे यांची माहिती शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा पर्दाफाश करणारशेतकरी नेत्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२४-शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या परिषदेला राज्यभरातून सुमारे ३० हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती  रविवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा श्ािंदे यांनी दिली. 

यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सचिन धांडे,  जिल्हा सुकाणू समितीचे सदस्य मुकूंद सपकाळे, शंभू पाटील, दिलीप सपकाळे, पियूष पाटील उपस्थित होते. 

प्रतिभा शिंदे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रतिनिधी व राज्याचे जलपसंदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून बेमुदत उपोषण केले. मात्र त्यांच्याच सरकारकडून कापसाला ४ हजार १०० रुपये भाव दिला जात आहे.  एकेकाळी शेतकºयांचे हित सांगणारे नेते आज हमीभाव व कर्जमुक्तीवर उत्तर द्यायला पुढे येत नाही, त्यामुळेच ही परिषद जळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ३०० सभा घेतल्या शासनाच्या सर्व  फसव्या योजनांचा पर्दाफाश शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

शेतकरी नेत्यांचा सहभागपरिषदेत राज्यभरातील विविध ४० शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत. त्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ.बाबा आढावा. आमदार बच्चू कडू, डॉ.अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, महाराष्टÑ किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे, बळीराजा संघटनेचे संजय घाटणेकर आदी नेत्यांचा समावेश आहे.

शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आयात-निर्यातबाबतीतील धोरण जे शेतकºयांच्या हिताचे असावे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, हमाल मापाडी, रिक्षा चालक युनियन, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग या परिषदेत सहभागी होणार असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.