शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत सहभागी होणार ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:42 IST

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. 

ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत प्रतिभा शिंदे यांची माहिती शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा पर्दाफाश करणारशेतकरी नेत्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२४-शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या परिषदेला राज्यभरातून सुमारे ३० हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती  रविवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा श्ािंदे यांनी दिली. 

यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सचिन धांडे,  जिल्हा सुकाणू समितीचे सदस्य मुकूंद सपकाळे, शंभू पाटील, दिलीप सपकाळे, पियूष पाटील उपस्थित होते. 

प्रतिभा शिंदे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रतिनिधी व राज्याचे जलपसंदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून बेमुदत उपोषण केले. मात्र त्यांच्याच सरकारकडून कापसाला ४ हजार १०० रुपये भाव दिला जात आहे.  एकेकाळी शेतकºयांचे हित सांगणारे नेते आज हमीभाव व कर्जमुक्तीवर उत्तर द्यायला पुढे येत नाही, त्यामुळेच ही परिषद जळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ३०० सभा घेतल्या शासनाच्या सर्व  फसव्या योजनांचा पर्दाफाश शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

शेतकरी नेत्यांचा सहभागपरिषदेत राज्यभरातील विविध ४० शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत. त्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ.बाबा आढावा. आमदार बच्चू कडू, डॉ.अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, महाराष्टÑ किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे, बळीराजा संघटनेचे संजय घाटणेकर आदी नेत्यांचा समावेश आहे.

शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आयात-निर्यातबाबतीतील धोरण जे शेतकºयांच्या हिताचे असावे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, हमाल मापाडी, रिक्षा चालक युनियन, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग या परिषदेत सहभागी होणार असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.