शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत सहभागी होणार ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:42 IST

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. 

ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत प्रतिभा शिंदे यांची माहिती शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा पर्दाफाश करणारशेतकरी नेत्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२४-शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या परिषदेला राज्यभरातून सुमारे ३० हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती  रविवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा श्ािंदे यांनी दिली. 

यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सचिन धांडे,  जिल्हा सुकाणू समितीचे सदस्य मुकूंद सपकाळे, शंभू पाटील, दिलीप सपकाळे, पियूष पाटील उपस्थित होते. 

प्रतिभा शिंदे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रतिनिधी व राज्याचे जलपसंदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून बेमुदत उपोषण केले. मात्र त्यांच्याच सरकारकडून कापसाला ४ हजार १०० रुपये भाव दिला जात आहे.  एकेकाळी शेतकºयांचे हित सांगणारे नेते आज हमीभाव व कर्जमुक्तीवर उत्तर द्यायला पुढे येत नाही, त्यामुळेच ही परिषद जळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ३०० सभा घेतल्या शासनाच्या सर्व  फसव्या योजनांचा पर्दाफाश शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

शेतकरी नेत्यांचा सहभागपरिषदेत राज्यभरातील विविध ४० शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत. त्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ.बाबा आढावा. आमदार बच्चू कडू, डॉ.अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, महाराष्टÑ किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे, बळीराजा संघटनेचे संजय घाटणेकर आदी नेत्यांचा समावेश आहे.

शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आयात-निर्यातबाबतीतील धोरण जे शेतकºयांच्या हिताचे असावे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, हमाल मापाडी, रिक्षा चालक युनियन, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग या परिषदेत सहभागी होणार असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.