शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत सहभागी होणार ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:42 IST

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. 

ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत प्रतिभा शिंदे यांची माहिती शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा पर्दाफाश करणारशेतकरी नेत्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२४-शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या परिषदेला राज्यभरातून सुमारे ३० हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती  रविवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा श्ािंदे यांनी दिली. 

यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सचिन धांडे,  जिल्हा सुकाणू समितीचे सदस्य मुकूंद सपकाळे, शंभू पाटील, दिलीप सपकाळे, पियूष पाटील उपस्थित होते. 

प्रतिभा शिंदे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रतिनिधी व राज्याचे जलपसंदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून बेमुदत उपोषण केले. मात्र त्यांच्याच सरकारकडून कापसाला ४ हजार १०० रुपये भाव दिला जात आहे.  एकेकाळी शेतकºयांचे हित सांगणारे नेते आज हमीभाव व कर्जमुक्तीवर उत्तर द्यायला पुढे येत नाही, त्यामुळेच ही परिषद जळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत ३०० सभा घेतल्या शासनाच्या सर्व  फसव्या योजनांचा पर्दाफाश शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

शेतकरी नेत्यांचा सहभागपरिषदेत राज्यभरातील विविध ४० शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत. त्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ.बाबा आढावा. आमदार बच्चू कडू, डॉ.अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, महाराष्टÑ किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे, बळीराजा संघटनेचे संजय घाटणेकर आदी नेत्यांचा समावेश आहे.

शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आयात-निर्यातबाबतीतील धोरण जे शेतकºयांच्या हिताचे असावे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, हमाल मापाडी, रिक्षा चालक युनियन, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग या परिषदेत सहभागी होणार असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.