शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिन विशेष :भारत मातेच्या जयजयकारात फडकला तिरंगा !

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : ‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.शिवाजी मराठे यांच्या मनात बालपणीच देशभक्तीची ज्योत पेटली होती. घरची परिस्थिती बेताची असली तरी देशासाठी काही तरी करण्याचा संकल्पही त्यांनी मनोमन रुजवून घेतला होता. १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात हाती तिरंगा घेऊन त्यांनी सहभाग घेतला. ७३ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावर्षी १९४७ मध्ये ते पालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होतं अवघे आठ वर्ष. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.रेडिओवरील भाषणांनी मिळाली प्रेरणास्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, 'मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडील आणि शिक्षकांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य- पारतंत्र्य, स्वातंत्र्य लढा असे शब्द ऐकायला मिळायचे. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरुन ऐकली जायची. रेडिओवरील भाषणे ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची. ही भाषणे प्रेरणादायी असायची...’ १५ आॅगस्ट १९४७ची आठवण सांगताना त्यांचे डोळे भरुन आले. ते म्हणाले, ‘तो दिवस अजूनही स्मरणात आहे. त्यादिवशी भारत स्वातंत्र्य झाला म्हणून वंदे मातरमसह भारतमातेचा झालेला गजर अजूनही कानात रेंगाळतोय. मिळालेल्या मिठाईची चवही जिभेवर आहेच. शेवटच्या श्वासापर्यंत या आठवणी कायमच ताज्या राहतील...’स्वार्थ बळावतो आहेसद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, ‘युवापिढी चंगळवादासोबतच फेसबुकी आणि सेल्फीवादी झाली आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी...’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.काश्मीरबाबतचा निर्णय योग्यच‘काश्मीरमधील ३७० कलम हटवून आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण विश्वालाच भारतीय सार्वभौमत्वाचा योग्य तो संदेश दिला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्याला आता विकासाच्या प्रवाहात येता येईल. बहुमताचे सरकार असल्यानेच असे ऐतिहासिक निर्णय घेता येतात.. सरकार कुणाचेही असो त्याचा पाया देशप्रेमावर रचलेला असला पाहिजे....' काश्मीर निर्णयाविषयीदेखील अशा शब्दात शिवाजी मराठे यांनी सरकारची पाठराखण केली.आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवशिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी ते १५ दिवस गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तीदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा भारतभरातील इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChalisgaonचाळीसगाव