शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिन विशेष :भारत मातेच्या जयजयकारात फडकला तिरंगा !

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : ‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.शिवाजी मराठे यांच्या मनात बालपणीच देशभक्तीची ज्योत पेटली होती. घरची परिस्थिती बेताची असली तरी देशासाठी काही तरी करण्याचा संकल्पही त्यांनी मनोमन रुजवून घेतला होता. १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात हाती तिरंगा घेऊन त्यांनी सहभाग घेतला. ७३ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावर्षी १९४७ मध्ये ते पालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होतं अवघे आठ वर्ष. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.रेडिओवरील भाषणांनी मिळाली प्रेरणास्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, 'मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडील आणि शिक्षकांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य- पारतंत्र्य, स्वातंत्र्य लढा असे शब्द ऐकायला मिळायचे. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरुन ऐकली जायची. रेडिओवरील भाषणे ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची. ही भाषणे प्रेरणादायी असायची...’ १५ आॅगस्ट १९४७ची आठवण सांगताना त्यांचे डोळे भरुन आले. ते म्हणाले, ‘तो दिवस अजूनही स्मरणात आहे. त्यादिवशी भारत स्वातंत्र्य झाला म्हणून वंदे मातरमसह भारतमातेचा झालेला गजर अजूनही कानात रेंगाळतोय. मिळालेल्या मिठाईची चवही जिभेवर आहेच. शेवटच्या श्वासापर्यंत या आठवणी कायमच ताज्या राहतील...’स्वार्थ बळावतो आहेसद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, ‘युवापिढी चंगळवादासोबतच फेसबुकी आणि सेल्फीवादी झाली आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी...’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.काश्मीरबाबतचा निर्णय योग्यच‘काश्मीरमधील ३७० कलम हटवून आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण विश्वालाच भारतीय सार्वभौमत्वाचा योग्य तो संदेश दिला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्याला आता विकासाच्या प्रवाहात येता येईल. बहुमताचे सरकार असल्यानेच असे ऐतिहासिक निर्णय घेता येतात.. सरकार कुणाचेही असो त्याचा पाया देशप्रेमावर रचलेला असला पाहिजे....' काश्मीर निर्णयाविषयीदेखील अशा शब्दात शिवाजी मराठे यांनी सरकारची पाठराखण केली.आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवशिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी ते १५ दिवस गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तीदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा भारतभरातील इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChalisgaonचाळीसगाव