शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळणार पोटभर जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना होणार आहे. जून महिन्यात त्यांना दरमहा ८ रुपये किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जाणार आहेत. या योजनेत केशरी कार्डधारकांना प्रति माह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शासकीय गोदामे आणि रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या धान्यातून सध्या हे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना मे २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सवलतीच्या दराने धान्य वितरण करण्यात आले होते. मात्र या कालावधीत धान्याची पुरेशी उचल झालेली नसल्याने हे अन्नधान्य जून २०२१ या कालावधीत गहू ८ रुपये आणि तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने हे धान्य वितरित करण्यात यावे. वितरणाच्या आधी धान्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक रास्त भाव दुकानातील पाच लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक

बीपीएल - ४७,०९५०

अंत्योदय - १३,७७४९

केशरी - ३२,३०११

बीपीएलच्या ४ लाख ७० हजार कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात या आधी सुरू असलेल्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७० हजार ९५० बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळाला आहे. तसेच अंत्योदय योजनेतील १ लाख ३७ हजार ७४९ जणांना या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे.

केशरीच्या ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळणार लाभ

जून महिन्यात जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार ११ कुटुंबांना या सवलतीच्या दरातील धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षीदेखील अशा प्रकारे या योजनांचा लाभ केशरी कार्डधारकांना देण्यात आला होता. त्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले होते. आतादेखील राज्य सरकारने शिल्लक राहिलेल्या धान्यातून सवलतीच्या दरात धान्य देण्याचे आदेश दिले आहेत.