शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

कळमसरेत अतिवृष्टीने ३३७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:25 IST

२०० हेक्टरवरील पिके बुडाली

कळमसरे, ता.अमळनेर : परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात लहानमोठ्या ३३७ घरांची पडझड झाली.सुमारे २०० हेक्टर शेतातील पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. कळमसरसह खेडी व वासरे परिसरात झालेल्या पावसामुळे त्या गावांचे ओसंडून वाहणारे पाणी येथील नाल्यात शिरले. मागच्या वर्षी लौकवर्गणीतून बांधलेल्या हरषा तलावाला सांडवा नसल्याने तुडूंब भरलेले तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतातून वाहत विकास सोसायटी, मस्जिद इमारत, पाडळसे फाट्यापासून भिल्ल वसाहत, वडारवाडीत शिरले. बसस्थानक परिसरात नाल्याचे पाणी दाटल्याने इंदिरानगर, न्यू प्लॉट वसाहतीला वेढा बसला. संपूर्ण गाव पाण्याच्या वेढ्यात एखाद्या बेटासारखे वेढले गेले होते. हे पाणी शेतातून पांझरा नदीच्या दिशेने वाहत गेले.२०० घरांचे पंचनामेतहसीलदार ज्योती देवरे यांनी मारवड मंडळ अधिकारी शिंदे व अमळगाव मंडळाचे योगेश पवार यांच़्या नेतृृत्वाखाली २५ तलाठी, महसुल कर्मचाऱ्यांचा ताफा घरांच्या पंचनाम्यासाठी नियुक्त केलेला आहे. ९ रोजी दुपारपर्यत २०० घरांचा पंचनामा झाला. मधेच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काही वेळ काम थांबले होते.कायमस्वरूपी उपाय हवाभविष्यात पुन्हा असा प्रसंग उद्भवू नये यासाठी आतापासूनच कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पाडळसेत कोणतेही नुकसान नाहीपाडळसे गावाला पाण्याचा वेढा होता. मात्र यातून घरांचे कोणतेही नुकसान झाले नाही. ही पुनवर्सित वसाहत असल्याने येथे घरांना धोका पोचला नाही.