शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरसोदच्या निवृत्त मुख्याध्यापकास 24 हजाराचा ऑनलाईन गंडा

By admin | Updated: February 10, 2017 00:43 IST

एटीएमचा विचारला कोड :20 मिनिटात दोन वेळा काढले पैसे

जळगाव : ‘तुमचे एटीएम बंद झाले आहे, ते सुरु करुन देतो’ असे सांगून ‘एटीएम’वरील कोड विचारुन तरसोद (ता.जळगाव) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची 23 हजार 500 रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर कक्षातील कर्मचा:यांनी तत्काळ खाते बंद करुन सूत्र हलविल्याने त्यातील 18 हजार 500 रुपये 24 तासात परत मिळविले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, तरसोद येथील रहिवाशी तुकाराम खंडू पाटील हे जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नशिराबाद येथील युनियन बॅँकेत त्यांचे बचत खाते आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बॅँकेतून शर्मा बोलतो आहे, असे सांगून त्याने पाटील यांना तुमचे बॅँक खाते आधारकार्डशी न जोडल्यामुळे तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. हे एटीएम मी सुरु करुन देतो त्यासाठी जुन्या एटीएमवरील क्रमांक विचारला. हा क्रमांक घेतल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोडय़ा वेळाने एटीएमचा ‘ओटीपी’ (ऑनलाईन ट्रान्झक्शन पासवर्ड) विचारला. पाटील यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित  व्यक्तीने विश्वासात घेवून विचारली. मोबाईल बंद झाल्यानंतर पाटील यांच्या खात्यातील 18 हजार 500 रुपये व त्यानंतर पुन्हा 5 हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला.

सायबर कक्षाच्या कर्मचा:यांनी हलविले सूत्रबॅँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मी तुमच्या बॅँकेत येतो असे सांगितले, मात्र त्यांनी तुम्ही येवू नका तुमचे काम झाले असे सांगून फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांना हा प्रकार संध्याकाळी मुलगा प्रफुल्ल पाटील यांना सांगितला. दुस:या दिवशी दोघंही पिता-पूत्र स्थानिक गुन्हे शाखेत आले. तेथील कर्मचारी संदीप साळवे, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, विजय चौधरी व नरेंद्र वारुळे यांनी संपूर्ण माहिती समजून घेत पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या सल्ल्याने तातडीने ऑनलाईन सूत्र हलविले. त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला व दुस:या दिवशी 18 हजार 500 रुपये परत मिळण्याचे संकेत मिळाले. दरम्यान, ही प्रक्रिया करीत असतानाही पाटील यांना संबंधित व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. ही व्यक्ती आसामची असल्याचे निष्पन्न झाले.

 

एटीएमचे पासवर्ड विचारुन ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही बँक खातेदारांना फोन करीत नाहीत व माहिती विचारत नाहीत,त्यामुळे नागरिकांनी कोणालाही फोनवर माहिती देवू नये. माहिती विचारण्याचा प्रय} झाला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.-डॉ.जालिंदर सुपेकर,  पोलीस अधीक्षक