शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये सुटीतही शिजणार खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:34 IST

शासनाचे आदेश : शिक्षकांमध्ये नाराजी

चाळीसगाव : मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शाळेत खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले. जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये खिचडी शिजवली जाईल. मुख्याध्यापकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांमध्ये सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.राज्यात दुष्काळाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत खिचडी शिजवून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे. शासनाने परिपत्रक जारी केले आहे. ४ तारखेपासून प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागली. सुट्या १६ जून अखेर असतील. सुट्टीच्या कालावधीतही मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरी, मे महिन्यात मुले शाळेत येत नाही. पालकांना समज देऊनही मुले शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे योजनेला हरताळ फासण्याची शक्यताच अधिक आहे. पोषण आहार शिजवून तो वाया गेल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ज्या भागात मुलांना दुष्काळात अन्न उपलब्ध होत नाही. तिथेच पोषण आहार देणे योग्य होईल. पोषण आहार शिजवण्यासह वाटपाचे नियोजन मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. उपशिक्षकांना कामे देण्यात यावी.महिनावर नियोजनात प्रत्येक दिवशी शिक्षकांची ड्युटी असेल. संबंधित शिक्षकाने शाळेत सकाळी सात वाजता उपस्थित राहून विद्यार्थीसंख्येनुसार बचत गटांकडून पोषण आहार शिजवायचा आहे. सकाळी ९ ते १० अशी वेळ आहे.