शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

२२ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीच्या कांदे बागाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता, तसेच जळगाव तालुक्यातील गिरणा व तापीच्या पट्ट्यात बुधवारी दुपारी दोन वाजेपासून वाहणाऱ्या 22 कि.मी. वेगाच्या वाऱ्यांनी केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्हाभरात पाऊस नसला तरी वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे तापमानातदेखील घट झाली असून, बुधवारी शहराचा पारा 38 अंशांपर्यंत खाली आला होता, तसेच किमान तापमानातदेखील घट झाली असून, वाऱ्यामुळे अधिक गारवा निर्माण झाला होता. रबीची पिके काढली गेल्यामुळे या वाऱ्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी कठोरा, भादली, करंज, आव्हाने, गाढोदे, पळसोद, फुपनगरी, नांद्रा या भागातील केळीच्या कांदे बागाचे नुकसान झाले आहे, तसेच ऐन काढणीवर असलेल्या मृग बागाचेदेखील काही भागांत नुकसान झाले आहे, तर मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे कडबादेखील ओला झाल्यामुळे चाऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेवर होणार परिणाम

जिल्ह्यात आता केळीच्या कांदे बागेची लागवड करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत केळीचे झाड खांद्याबरोबर वाढलेले आहे. अशा परिस्थितीत पुढील वाढीसाठी केळीच्या पानांद्वारे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया होऊन झाडाची वाढ अवलंबून असते. मात्र, बुधवारी आलेल्या वादळामुळे केळीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन झाडाची पुढील वाढ खुंटू शकते, तसेच पुढील महिन्यात तापमान वाढ झाली तर केळीला त्याचा फटकाही बसू शकतो, अशी माहिती प्रगतिशील शेतकरी डॉ. सत्त्वशील जाधव यांनी दिली.

अजून तीन दिवस पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून पूर्व उत्तर प्रदेश व बिहारमधील काही भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने व बंगालच्या उपसागरातील आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राचा दिशेने येत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजून तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊन 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.