शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे २१६५ विद्यार्थी परीक्षा न देता पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील इयत्ता दहावीचे २१६५ विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. बाधितांसोबतचं मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शासनाकडून राज्यात कडक निर्बंध घालून देण्‍यात आले आहेत. मागील वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मध्‍यंतरी काही दिवस शाळा उघडल्या होत्या. पण, कोरोनामुळे पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा होतील की नाही, हा संभ्रम पालकांसह विद्यार्थ्यांमध्‍ये होता. बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्‍यात आल्या होत्या. आता त्या परीक्षा देखील पुढे ढकलण्‍यात आल्या आहेत. यातच सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सीबीएसईच्या ३५ शाळांमधील २१६५ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यात १३३४ मुले आहेतर ८९१ मुलींचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने योग्य निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

===============

महिनाभरात होईल स्पष्ट

सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. मात्र, अजून बोर्डाच्या परीक्षांबाबत संभ्रम निमार्ण आहे. दुसरीकडे अकरावी, आयटीआय तसेच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत अद्याप कुठल्याही मार्गदर्शक सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत. महिनाभरात या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट होणार असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

===============

गुणदान पध्दत वेगवेगळी

सीबीएसईने दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली असून बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजेच राज्य मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. प्रत्येक बोर्डाची गुणदान पद्धत वेगवेगळी असल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा ठेवल्यास सर्व विद्यार्थ्यांना समपातळीवर आणता येईल. गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी तयार करणे हे दहावी-बारावीचे ध्येय बनून गेले आहे. कोरोनाच्या निमित्ताने त्यातून मोकळे होण्याची संधी आहे. कारण दहावी-बारावी

हे सर्टिफिकेट कोर्स आहेत हे विसरायला नको. त्यातच सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी उत्तीर्णतेबाबतीत काही निकष तयार होतील, अशी शक्यता आहे.

- डॉ. जगदीश पाटील, शिक्षणतज्ज्ञ

========

- एकूण विद्यार्थी : २१६५

- मुले : १३३४

- मुली : ८९१

========

सध्‍या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कोरोनाच्या काळात ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा झाल्या असत्या, तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आधीच शाळांकडून देखील विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत संपूर्ण तयारी करून घेण्‍यात आली होती.

- डॉ. राहुल पाटील, पालक

========

अतिशय योग्य निर्णय आहे. आता मात्र विद्यार्थ्यांना गुणदान कसे केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शाळेकडून पूर्व परीक्षा घेतली गेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्‍यास पूर्ण झाला होता. जर सीबीएसईने परीक्षा घेतली असती, तर ते चालले असते. पण सद्याची परिस्थिती पाहता, मुलांचा जीव धोक्यात टाकणे योग्‍य नाही.

- विभावरी जोशी, पालक

=======

दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे.

- संदीप पाटील, पालक