शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे २१६५ विद्यार्थी परीक्षा न देता पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील इयत्ता दहावीचे २१६५ विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. बाधितांसोबतचं मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शासनाकडून राज्यात कडक निर्बंध घालून देण्‍यात आले आहेत. मागील वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मध्‍यंतरी काही दिवस शाळा उघडल्या होत्या. पण, कोरोनामुळे पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा होतील की नाही, हा संभ्रम पालकांसह विद्यार्थ्यांमध्‍ये होता. बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्‍यात आल्या होत्या. आता त्या परीक्षा देखील पुढे ढकलण्‍यात आल्या आहेत. यातच सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सीबीएसईच्या ३५ शाळांमधील २१६५ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यात १३३४ मुले आहेतर ८९१ मुलींचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने योग्य निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

===============

महिनाभरात होईल स्पष्ट

सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. मात्र, अजून बोर्डाच्या परीक्षांबाबत संभ्रम निमार्ण आहे. दुसरीकडे अकरावी, आयटीआय तसेच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत अद्याप कुठल्याही मार्गदर्शक सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत. महिनाभरात या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट होणार असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

===============

गुणदान पध्दत वेगवेगळी

सीबीएसईने दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली असून बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजेच राज्य मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. प्रत्येक बोर्डाची गुणदान पद्धत वेगवेगळी असल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा ठेवल्यास सर्व विद्यार्थ्यांना समपातळीवर आणता येईल. गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी तयार करणे हे दहावी-बारावीचे ध्येय बनून गेले आहे. कोरोनाच्या निमित्ताने त्यातून मोकळे होण्याची संधी आहे. कारण दहावी-बारावी

हे सर्टिफिकेट कोर्स आहेत हे विसरायला नको. त्यातच सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी उत्तीर्णतेबाबतीत काही निकष तयार होतील, अशी शक्यता आहे.

- डॉ. जगदीश पाटील, शिक्षणतज्ज्ञ

========

- एकूण विद्यार्थी : २१६५

- मुले : १३३४

- मुली : ८९१

========

सध्‍या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कोरोनाच्या काळात ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा झाल्या असत्या, तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आधीच शाळांकडून देखील विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत संपूर्ण तयारी करून घेण्‍यात आली होती.

- डॉ. राहुल पाटील, पालक

========

अतिशय योग्य निर्णय आहे. आता मात्र विद्यार्थ्यांना गुणदान कसे केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शाळेकडून पूर्व परीक्षा घेतली गेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्‍यास पूर्ण झाला होता. जर सीबीएसईने परीक्षा घेतली असती, तर ते चालले असते. पण सद्याची परिस्थिती पाहता, मुलांचा जीव धोक्यात टाकणे योग्‍य नाही.

- विभावरी जोशी, पालक

=======

दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे.

- संदीप पाटील, पालक