शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ ...

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ हार १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार १५४ जण गंभीर, तर १ हजार ८४१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षात ७२१ अपघात ठार झाले, तर ४७१ जण ठार झाले आहेत. एकंदरीत अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांचीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपूर्ण देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. खराब रस्ते, साइडपट्ट्या, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्याचेही त्याला कारण कारणीभूत आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुचाकी, कार व अन्य प्रकारातील सर्व वाहनांची संख्या ही जिल्ह्यात १० लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व त्यानंतर राज्य मार्गावर झालेले आहेत. यातील काही बळी हे अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांपेक्षा

अपघातात ठारची संख्या अधिक

देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीनपेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील, तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे, असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत.

सहा वर्षांतील अपघात व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी जखमी

२०१६ ३८५ ४२५ ५६१ २१८

२०१७ ८३१ ४२२ ३२८ ६१०

२०१८ ८२५ ३९६ ४४३ ४५४

२०१९ ७८४ ४३५ ४४५ ३६८

२०२० ७२१ ४७१ ३७७ १९१

एकूण ३,५४६ २,१४९ २,१५४ १,८४१