शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ ...

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ हार १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार १५४ जण गंभीर, तर १ हजार ८४१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षात ७२१ अपघात ठार झाले, तर ४७१ जण ठार झाले आहेत. एकंदरीत अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांचीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपूर्ण देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. खराब रस्ते, साइडपट्ट्या, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्याचेही त्याला कारण कारणीभूत आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुचाकी, कार व अन्य प्रकारातील सर्व वाहनांची संख्या ही जिल्ह्यात १० लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व त्यानंतर राज्य मार्गावर झालेले आहेत. यातील काही बळी हे अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांपेक्षा

अपघातात ठारची संख्या अधिक

देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीनपेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील, तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे, असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत.

सहा वर्षांतील अपघात व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी जखमी

२०१६ ३८५ ४२५ ५६१ २१८

२०१७ ८३१ ४२२ ३२८ ६१०

२०१८ ८२५ ३९६ ४४३ ४५४

२०१९ ७८४ ४३५ ४४५ ३६८

२०२० ७२१ ४७१ ३७७ १९१

एकूण ३,५४६ २,१४९ २,१५४ १,८४१