शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ ...

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ हार १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार १५४ जण गंभीर, तर १ हजार ८४१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षात ७२१ अपघात ठार झाले, तर ४७१ जण ठार झाले आहेत. एकंदरीत अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांचीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपूर्ण देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. खराब रस्ते, साइडपट्ट्या, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्याचेही त्याला कारण कारणीभूत आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुचाकी, कार व अन्य प्रकारातील सर्व वाहनांची संख्या ही जिल्ह्यात १० लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व त्यानंतर राज्य मार्गावर झालेले आहेत. यातील काही बळी हे अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांपेक्षा

अपघातात ठारची संख्या अधिक

देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीनपेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील, तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे, असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत.

सहा वर्षांतील अपघात व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी जखमी

२०१६ ३८५ ४२५ ५६१ २१८

२०१७ ८३१ ४२२ ३२८ ६१०

२०१८ ८२५ ३९६ ४४३ ४५४

२०१९ ७८४ ४३५ ४४५ ३६८

२०२० ७२१ ४७१ ३७७ १९१

एकूण ३,५४६ २,१४९ २,१५४ १,८४१