शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीई' शुल्क प्रतिपूर्तीचे २१ कोटी शासनाकडे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) होणा-या प्रवेशांसाठी राज्य शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या जाणा-या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) होणा-या प्रवेशांसाठी राज्य शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या जाणा-या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून थकीत आहे. थकीत रक्कम ही तब्बल २१ कोटी ३८ लाख २ हजार ९१ रूपयांवर पोहोचली असून प्रतिपूर्ती मिळत नसल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर आता आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची राज्य शासनाकडून शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जाते. मात्र, ही प्रतिपूर्ती नियमितपणे होत नसल्याने खासगी शाळांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी जळगाव जिल्ह्यात अडीचशेच्यावर शाळांमध्ये आरटीईतंर्गत विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शाळांची गेल्या तीन वर्षांपासूनची शुल्क प्रतिपूर्ती राज्य शासनाकडे थकीत आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षाची सुमारे २१ कोटी ३८ लाख रूपयांची थकबाकी शासनाकडे असल्याची माहिती समोर आली आहे.

तुटपूंजे अनुदान मिळते...

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने जळगाव शिक्षण विभागाला केवळ १ कोटी ८७ हजार रूपये अनुदान दिले होते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची आरटीई शुल्क प्रतिपूर्ती सुध्दा शाळा पन्नास टक्केच करण्‍यात आली होती. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी राबविण्‍यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून १ कोटी ५७ लाख ७६ हजार रूपये मंजूर झाले आहे. हा निधी अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. काही दिवसात शिक्षण विभागाला हे अनुदान मिळताच ते शाळांना वर्ग करण्‍यात येणार आहे.

प्रतिपूर्तीची प्रतीक्षा

२१ कोटी रूपयांची शासनाकडे आरटीई प्रतिपूर्तीची थकबाकी असताना, सुध्दा शासनाकडे दरवर्षी तुटपूंजे अनुदान मिळत आहे. परिणामी, आता खाजगी शाळांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. यामुळे राज्यातील काही शाळांनी प्रतिपूर्ती न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही. असा पवित्रा घेतला आहे.

परतावा मिळत नसेल तर ॲडमिशन का द्यावे

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुध्दा शासनाकडून दखल घेतली जात नाही. शाळा बंद पडण्यावर आल्या आहेत. शिक्षकांना पगार नाहीत. इमारती भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत. वाहने कर्जाने घेतली आहेत. त्यात शासनाकडून आरटीई प्रतिपूर्ती होत नाही. यामुळे संस्था चालक अडचणीत सापडले आहे. जर शासनाकडून परतावा मिळत नसेल तर ॲडमिशन आम्ही का द्यावे असा, सवाल आरटीई फाउंडेशनच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकर परतावा न मिळाल्यास उपोषण करण्‍यात येईल, असाही इशारा देण्‍यात आला आहे.