शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अवयवदानासाठी जळगाव जिल्ह्यात 200 जणांचा संकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 12:55 IST

प्रतिसाद : जिल्ह्यात 800 ठिकाणी झाल्या ग्रामसभा, विद्याथ्र्याचाही पुढाकार

ठळक मुद्देविद्यापीठात 350 विद्याथ्र्यानी घेतली अवदानाची प्रतिज्ञा20 ते 25 हजार अर्ज भरण्याचा संकल्प800 ग्रामसभा घेण्यात आल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  अवयवदानाविषयी जनजागृती होण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय महा अवयवदान अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 29 रोजी 800 ठिकाणी ग्रामसभा झाल्या. यासाठी 150 ते 200 जणांनी अर्ज भरून दिल्याचे सांगण्यात आले. शहरांसोबतच गाव पातळीवर अवयवदानाची मोहीम राबविण्यासाठी 29 व 30 ऑगस्ट रोजी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जात असून जळगाव जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 29 रोजी जवळपास 800 ग्रामसभा घेण्यात आल्या. या सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कर्मचा:यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील यांनी रावेर तालुक्यात शाळेमध्ये जाऊन या विषयी मार्गदर्शन केले.  अवयवदानासाठी इच्छुक व्यक्तींकडून अजर्देखील भरून घेतले जात असून यामध्ये जिल्ह्यात पहिल्या दिवशी 150 ते 200 अर्ज भरले गेल्याची माहिती डॉ. बी.आर. पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आशा सेविकांची यात मदत घेतली जात असून आता एकेका आशा सेविकेकडून  प्रत्येकी 10 अर्ज भरुन घेण्याचे नियोजन असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. यातून किमान 20 ते 25 हजार अर्ज भरुन घेण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. किमान 800 ग्रामसभा व 200 अर्ज भरल्या गेल्याचा अंदाज डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. यामध्ये एकटय़ा अमळनेर तालुक्यात तब्बल 125 ग्रामसभा झाल्या. राज्यात जळगाव अव्वल ठरविण्याचा प्रयत्न- डॉ. एन.एस. चव्हाणदेशभरात अवयवदानाच्या चळवळीला प्रतिसाद वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात हे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यात जास्तीत अवयवदानाची संख्या वाढवून जिल्हा राज्यात अव्वल करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. अवयव दानाच्या चळवळीचे स्वरुप वाढत असून जळगाव जिल्ह्यात ही सुविधा नसली तरी यासाठी अद्यायावत रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. चव्हाण म्हणाले. ही चळवळ वाढत असल्याने अवयवदानाची सुविधा नसल्याची अडचण आताच निर्माण झाली आहे. त्यामुळे यावरही मात केली जाईल.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी अवयवदान जनजागृती अभियानाअंतर्गत 350 विद्याथ्र्यानी अवदानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी  आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.पी.पी.पाटील यांनी अवयदात्यांची सूची करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल असे सांगितले. तर दत्तात्रय कराळे यांनी अवयवदानामुळे मृत्यू नंतरही आपण हे जग पाहू शकतो, असे सांगितले.