शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानासाठी जळगाव जिल्ह्यात 200 जणांचा संकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 12:55 IST

प्रतिसाद : जिल्ह्यात 800 ठिकाणी झाल्या ग्रामसभा, विद्याथ्र्याचाही पुढाकार

ठळक मुद्देविद्यापीठात 350 विद्याथ्र्यानी घेतली अवदानाची प्रतिज्ञा20 ते 25 हजार अर्ज भरण्याचा संकल्प800 ग्रामसभा घेण्यात आल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  अवयवदानाविषयी जनजागृती होण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय महा अवयवदान अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 29 रोजी 800 ठिकाणी ग्रामसभा झाल्या. यासाठी 150 ते 200 जणांनी अर्ज भरून दिल्याचे सांगण्यात आले. शहरांसोबतच गाव पातळीवर अवयवदानाची मोहीम राबविण्यासाठी 29 व 30 ऑगस्ट रोजी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जात असून जळगाव जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 29 रोजी जवळपास 800 ग्रामसभा घेण्यात आल्या. या सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कर्मचा:यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील यांनी रावेर तालुक्यात शाळेमध्ये जाऊन या विषयी मार्गदर्शन केले.  अवयवदानासाठी इच्छुक व्यक्तींकडून अजर्देखील भरून घेतले जात असून यामध्ये जिल्ह्यात पहिल्या दिवशी 150 ते 200 अर्ज भरले गेल्याची माहिती डॉ. बी.आर. पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आशा सेविकांची यात मदत घेतली जात असून आता एकेका आशा सेविकेकडून  प्रत्येकी 10 अर्ज भरुन घेण्याचे नियोजन असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. यातून किमान 20 ते 25 हजार अर्ज भरुन घेण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. किमान 800 ग्रामसभा व 200 अर्ज भरल्या गेल्याचा अंदाज डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. यामध्ये एकटय़ा अमळनेर तालुक्यात तब्बल 125 ग्रामसभा झाल्या. राज्यात जळगाव अव्वल ठरविण्याचा प्रयत्न- डॉ. एन.एस. चव्हाणदेशभरात अवयवदानाच्या चळवळीला प्रतिसाद वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात हे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यात जास्तीत अवयवदानाची संख्या वाढवून जिल्हा राज्यात अव्वल करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. अवयव दानाच्या चळवळीचे स्वरुप वाढत असून जळगाव जिल्ह्यात ही सुविधा नसली तरी यासाठी अद्यायावत रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. चव्हाण म्हणाले. ही चळवळ वाढत असल्याने अवयवदानाची सुविधा नसल्याची अडचण आताच निर्माण झाली आहे. त्यामुळे यावरही मात केली जाईल.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी अवयवदान जनजागृती अभियानाअंतर्गत 350 विद्याथ्र्यानी अवदानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी  आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.पी.पी.पाटील यांनी अवयदात्यांची सूची करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल असे सांगितले. तर दत्तात्रय कराळे यांनी अवयवदानामुळे मृत्यू नंतरही आपण हे जग पाहू शकतो, असे सांगितले.