शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २०० किमी रस्त्यांचे होणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील रस्त्यांची कामे होऊ शकली नसून, आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २०० किमी च्या रस्त्यांचे काम केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१२ मे रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून केल्या जाणाऱ्या ७० कोटी रुपयांच्या कामांचा ठराव रद्द करून, नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या मात्र शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून सर्व रस्त्यांची कामे करण्यात यावी असा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला होता. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मनपा बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. तसेच १०० पैकी ४२ कोटी रुपयांच्या निधीतून आधी तयार केलेले प्रस्ताव देखील रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे आता शंभर कोटी रुपयांचा कामातून केवळ रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.

सप्टेंबर नंतरच होणार रस्त्यांची कामे

अमृत योजनेअंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात पाणी पुरवठा योजनेचे खोदकामाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. केवळ टाक्यांचे व जोडणीचे काम शिल्लक आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून शासनाची तांत्रिक मान्यता घेऊन ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू असून, मान्सून दाखल होण्याआधीच डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.

या रस्त्यांच्या कामांना देणार प्राधान्य

शंभर कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्ते देखील तयार केले जाणार आहेत. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशन पर्यंत चा रस्ता, सुरत रेल्वे गेट ते निमखेडी पर्यंतचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते चित्र चौक, आकाशवाणी चौक ते नेरी नाका , टॉवर चौक ते अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट ते रिंग रोड परिसर, नवसाचा गणपती मंदिर, पिंप्राळा रेल्वे गेट ते गोविंदा रिक्षा स्टॉप, स्वातंत्र्य चौक ते टॉवर चौक हे रस्ते प्राधान्याने केली जाणार आहेत. यासह भोईटे नगर ते पिं प्राळा चौक, रामानंद घाट ते काव्यरत्नावली चौक, मेहरून परिसरासह जुने जळगाव परिसरातील रस्ते देखील या निधीतून तयार केले जाणार आहेत.