शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शहरातील २०० किमी रस्त्यांचे होणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील रस्त्यांची कामे होऊ शकली नसून, आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २०० किमी च्या रस्त्यांचे काम केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१२ मे रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून केल्या जाणाऱ्या ७० कोटी रुपयांच्या कामांचा ठराव रद्द करून, नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या मात्र शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून सर्व रस्त्यांची कामे करण्यात यावी असा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला होता. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मनपा बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. तसेच १०० पैकी ४२ कोटी रुपयांच्या निधीतून आधी तयार केलेले प्रस्ताव देखील रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे आता शंभर कोटी रुपयांचा कामातून केवळ रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.

सप्टेंबर नंतरच होणार रस्त्यांची कामे

अमृत योजनेअंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात पाणी पुरवठा योजनेचे खोदकामाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. केवळ टाक्यांचे व जोडणीचे काम शिल्लक आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून शासनाची तांत्रिक मान्यता घेऊन ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू असून, मान्सून दाखल होण्याआधीच डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.

या रस्त्यांच्या कामांना देणार प्राधान्य

शंभर कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्ते देखील तयार केले जाणार आहेत. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशन पर्यंत चा रस्ता, सुरत रेल्वे गेट ते निमखेडी पर्यंतचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते चित्र चौक, आकाशवाणी चौक ते नेरी नाका , टॉवर चौक ते अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट ते रिंग रोड परिसर, नवसाचा गणपती मंदिर, पिंप्राळा रेल्वे गेट ते गोविंदा रिक्षा स्टॉप, स्वातंत्र्य चौक ते टॉवर चौक हे रस्ते प्राधान्याने केली जाणार आहेत. यासह भोईटे नगर ते पिं प्राळा चौक, रामानंद घाट ते काव्यरत्नावली चौक, मेहरून परिसरासह जुने जळगाव परिसरातील रस्ते देखील या निधीतून तयार केले जाणार आहेत.