शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

शहरातील २०० किमी रस्त्यांचे होणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षर: दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या ताणामुळे शहरातील रस्त्यांची कामे होऊ शकली नसून, आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २०० किमी च्या रस्त्यांचे काम केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१२ मे रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून केल्या जाणाऱ्या ७० कोटी रुपयांच्या कामांचा ठराव रद्द करून, नगरोत्थान योजनेअंतर्गत मनपाला दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या मात्र शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून सर्व रस्त्यांची कामे करण्यात यावी असा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला होता. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मनपा बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. तसेच १०० पैकी ४२ कोटी रुपयांच्या निधीतून आधी तयार केलेले प्रस्ताव देखील रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे आता शंभर कोटी रुपयांचा कामातून केवळ रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.

सप्टेंबर नंतरच होणार रस्त्यांची कामे

अमृत योजनेअंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात पाणी पुरवठा योजनेचे खोदकामाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. केवळ टाक्यांचे व जोडणीचे काम शिल्लक आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून शासनाची तांत्रिक मान्यता घेऊन ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू असून, मान्सून दाखल होण्याआधीच डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.

या रस्त्यांच्या कामांना देणार प्राधान्य

शंभर कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्ते देखील तयार केले जाणार आहेत. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशन पर्यंत चा रस्ता, सुरत रेल्वे गेट ते निमखेडी पर्यंतचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते चित्र चौक, आकाशवाणी चौक ते नेरी नाका , टॉवर चौक ते अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट ते रिंग रोड परिसर, नवसाचा गणपती मंदिर, पिंप्राळा रेल्वे गेट ते गोविंदा रिक्षा स्टॉप, स्वातंत्र्य चौक ते टॉवर चौक हे रस्ते प्राधान्याने केली जाणार आहेत. यासह भोईटे नगर ते पिं प्राळा चौक, रामानंद घाट ते काव्यरत्नावली चौक, मेहरून परिसरासह जुने जळगाव परिसरातील रस्ते देखील या निधीतून तयार केले जाणार आहेत.