शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

रावेरला वादळी पावसामुळे २ कोटी ३६ लाखांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 16:07 IST

४४ गावातील ४९९ शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका

किरण चौधरी

रावेर जि. जळगाव : तालुक्यात १८ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे दोन कोटी ३६ लाखांचे नुकसान झाले आहे. यात ४४ गावातील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे, असा अंतिम अहवाल तालुका प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील रावेरसह चोरवड, खानापूर, कर्जोद, वाघोड, केर्हाळे, विटवे, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, निंभोरा रेंभोटा व वाघाडी शिवारासह ४४ गावांचा यात समावेश आहे. यात रब्बी हंगामातील हरभरा,मका व गव्हाचे उभे पीक तसेच केळीबागा अवकाळी व वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाल्या होत्या.

 पंचनाम्यातील अहवालानुसार,तालुक्यातील १५४ शेतकऱ्यांच्या ११९ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पीक वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले. यात ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच, ८४ शेतकऱ्यांच्या ५४ हेक्टर क्षेत्रातील गहू जमीनदोस्त झाला. यात ९६ लाख ४८ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच २४८ शेतकऱ्यांचा १४३ हेक्टर क्षेत्रातील मका जमीनदोस्त होऊन ३२ लाख ३२ हजारांचे तर १४ शेतकऱ्यांच्या ७ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३६ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

नुकसानीचा अंतिम अहवाल बुधवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व प्रभारी तालुका कृषी अधिकारी एम. जी. भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.