शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रावेरला वादळी पावसामुळे २ कोटी ३६ लाखांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 16:07 IST

४४ गावातील ४९९ शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका

किरण चौधरी

रावेर जि. जळगाव : तालुक्यात १८ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे दोन कोटी ३६ लाखांचे नुकसान झाले आहे. यात ४४ गावातील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे, असा अंतिम अहवाल तालुका प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील रावेरसह चोरवड, खानापूर, कर्जोद, वाघोड, केर्हाळे, विटवे, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, निंभोरा रेंभोटा व वाघाडी शिवारासह ४४ गावांचा यात समावेश आहे. यात रब्बी हंगामातील हरभरा,मका व गव्हाचे उभे पीक तसेच केळीबागा अवकाळी व वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाल्या होत्या.

 पंचनाम्यातील अहवालानुसार,तालुक्यातील १५४ शेतकऱ्यांच्या ११९ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पीक वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले. यात ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच, ८४ शेतकऱ्यांच्या ५४ हेक्टर क्षेत्रातील गहू जमीनदोस्त झाला. यात ९६ लाख ४८ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच २४८ शेतकऱ्यांचा १४३ हेक्टर क्षेत्रातील मका जमीनदोस्त होऊन ३२ लाख ३२ हजारांचे तर १४ शेतकऱ्यांच्या ७ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३६ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

नुकसानीचा अंतिम अहवाल बुधवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व प्रभारी तालुका कृषी अधिकारी एम. जी. भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.