शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उपचारापूर्वीच झाला कोरोनामुळे १९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे १९ बाधितांचे मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद शासकीय पातळीवर करण्यात आली आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे १९ बाधितांचे मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद शासकीय पातळीवर करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही संख्या स्थिर आहे. मात्र, येत्या महिनाभरात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी २४ तासांच्या आत होणारे मृत्यू वाढले आहे. यात दोन दिवसांपूर्वीच सहा तासांच्या आत चार मृत्यू नोंदविण्यात आले होते.

कोरोनामध्ये उपचारांसाठी पर्याय उपलब्ध असावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती. यात जिल्हाभरात ४५ रुग्णालयांना कोरोना उपचारांची परवागनी देण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी त्यांचा मृत्यूदर वाढू नये म्हणून मध्यंतरी गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जात नव्हते आताही व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दाखल केले जात नसून व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या तीन दिवसात ४२ बाधितांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. दरम्यान, आजपर्यंत १५६९ कोरोना बाधितांचे मृत्यू झालेले आहेत. यात १९ मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद आहे.

जीएमसीतील मृत्यू : ५८८

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मृत्यू : ४५८

खासगी रुग्णालयातील मृत्यू : ५२३

जीएमसीतील ५५० मृत्यूंचे परीक्षण

२४ तासाच्या आतील मृत्यू : १६.१८ टक्के

२४ ते ७२ तासाच्या आत : २८ टक्के

पुरूष : ३६८

महिला १८२

तातडीने तपासणी करा

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे थोडीही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. दुसरीकडे अंगावर आजार काढल्याने तो जीवावर बेतू शकतो, असेही निदर्शनास आले आहे. शिवाय संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गृहविलगीकरणात लक्ष हवे

गृहविलगीकरणात ६६८६ रुग्ण असून या रुग्णांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा औषधोपचार न घेता केवळ विलगीकरणात राहिल्यानेही रुग्ण गंभीर होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या लक्षणानुसारच निर्णय घ्यावेत असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येते.