शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

उपचारापूर्वीच झाला कोरोनामुळे १९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे १९ बाधितांचे मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद शासकीय पातळीवर करण्यात आली आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे १९ बाधितांचे मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद शासकीय पातळीवर करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही संख्या स्थिर आहे. मात्र, येत्या महिनाभरात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी २४ तासांच्या आत होणारे मृत्यू वाढले आहे. यात दोन दिवसांपूर्वीच सहा तासांच्या आत चार मृत्यू नोंदविण्यात आले होते.

कोरोनामध्ये उपचारांसाठी पर्याय उपलब्ध असावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती. यात जिल्हाभरात ४५ रुग्णालयांना कोरोना उपचारांची परवागनी देण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी त्यांचा मृत्यूदर वाढू नये म्हणून मध्यंतरी गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जात नव्हते आताही व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दाखल केले जात नसून व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या तीन दिवसात ४२ बाधितांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. दरम्यान, आजपर्यंत १५६९ कोरोना बाधितांचे मृत्यू झालेले आहेत. यात १९ मृत्यू हे उपचारापूर्वीच झाल्याची नोंद आहे.

जीएमसीतील मृत्यू : ५८८

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मृत्यू : ४५८

खासगी रुग्णालयातील मृत्यू : ५२३

जीएमसीतील ५५० मृत्यूंचे परीक्षण

२४ तासाच्या आतील मृत्यू : १६.१८ टक्के

२४ ते ७२ तासाच्या आत : २८ टक्के

पुरूष : ३६८

महिला १८२

तातडीने तपासणी करा

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे थोडीही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. दुसरीकडे अंगावर आजार काढल्याने तो जीवावर बेतू शकतो, असेही निदर्शनास आले आहे. शिवाय संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गृहविलगीकरणात लक्ष हवे

गृहविलगीकरणात ६६८६ रुग्ण असून या रुग्णांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा औषधोपचार न घेता केवळ विलगीकरणात राहिल्यानेही रुग्ण गंभीर होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या लक्षणानुसारच निर्णय घ्यावेत असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येते.