शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

राज्यातील 32 पैकी 17 वीज निर्मिती संच बंद

By admin | Updated: June 27, 2017 13:10 IST

वीज दर जास्त असल्याने दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच बंद. कमी दरातील वीज खरेदीवर भर. एनटीपीसीकडून वीजेची खरेदी

पंढरीनाथ गवळी/ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.27 - पावसाळ्यामुळे राज्यभरात वीजेची मागणी घटली आहे. त्यामुळे दीपनगर वीज निर्मिती केंद्रासह राज्यातील 32 पैकी 17 वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प आहे. महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रात तयार होणा:या वीजेचे दर जास्त  आहेत. त्यामुळे कमी किमतीतील वीज खरेदीवर शासनाचा अधिक भर आहे. विशेष करुन एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन) व खाजगी वीज केंद्रातून वीज खरेदी केली जात आहे.
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन दोन महिन्या पूर्वीच लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा संच बंद करण्यात आला. या आधीच संच क्रमांक दोनही बंद आहे. आता संच क्रमांक पाच व चार एमओडीमध्ये असल्याने यातील संच क्रमांक पाच बंद करण्याचे आदेश आहेत. तर संच क्रमांक चार हॅड्रोजन शुद्धतेसाठी बंद करण्यात आला आहे.1 हजार 420 मेगाव्ॉट क्षमतेच्या दीपनगर वीज केंद्रातील वीज निर्मिती ठप्प आहे.
मागणी घटली
दरम्यान, राज्यात पावसाळा सुरू झाला आहे.त्यामुळे ऐरवी 20-22 हजार मेगाव्ॉट वीजेची मागणी असलेल्या राज्याची आजची सोमवार मागणी 15 हजार 185 मेगाव्ॉट इतकी आहे. तर महानिर्मितीची वीज निर्मिती 7 हजार मेगाव्ॉट इतकी आहे.
एनटीपीसीची वीज स्वस्त
दरम्यान, दीपनगर येथील सूत्रांनी सांगितले की, एनटीपीसीकडून महाराष्ट्र वीज खरेदी करते.त्याचा दर 2.50 पैसे इतका आहे. सध्या ज्या प्रमाणे पेट्रोल पंपावर रोज पेट्रोलचे दर बदलत आहेत.त्याप्रमाणे  राज्य व केंद्र वीज नियामक मंडळाकडून वीजेचे दर  प्रत्येक महिन्याला बदलत असतात,असे सूत्रांनी सांगितले.
 दीपनगर वीज केंद्रातील दर
सध्या दीपनगरातील वीज निर्मिती बंद असली तरी येथील 500 मेगाव्ॉटच्या दोन्ही संचाचे वीजेचे दर 2.89 पैसे इतके आहेत. 
दर वाढीचे कारण
महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रातील वीज दर जास्त असल्याचे कारण सांगतांना सूत्रांनी सांगितले की,  रेल्वेने कोळसा वाहून आणताना जास्त खर्च येतो. सध्या रेल्वेने कोळसा आणण्यासाठी 1700 रुपये टन या प्रमाणे खर्च येतो.याच्या उलट खाजगी वीज केंद्र हे कोळसा खाणींच्या शेजारी असल्याने त्यांची वीज आपल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होत आहे. सध्या काही खाजगी कंपनीचे दर दीड  रुपये युनिट असे आहेत.
एमओडी (मेरीट ऑर्डर डिसपॅच)
दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच एमओडीमध्ये गणले जातात (मेरीट ऑर्डर डिसपॅच) महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती खर्चाच्या क्रमाने वीज निर्मिती संच आहेत.त्यानुसार दर निश्चित केल जातात. सध्या दीपनगरातील दर दोन्ही संचांसाठी 2 रुपये 89 पैसे आहे. सध्या दीपनगरातील वीज निर्मिती थांबली असली तरी महाराष्ट्राची वीजेची मागणी वाढल्यानंतर येथील सर्व वीज निर्मिती संच पूर्ववत कार्यान्वित केले जातील,असे सूत्रांनी सांगितले. सध्या बंद असलेल्या संचाची दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यात येत आहे.
राज्यातील बंद संच या प्रमाणे..
महाजनकोचे राज्यात सात वीज निर्मिती केंद्र आहेत.त्यात दीपनगर-भुसावळ, एकलहरे-नाशिक,पारस,परळी,खापरखेडा, कोराडी आणि चंद्रपूर. यातील बंद संच असे नाशिक-1, कोराडी-3,खापरखेडा-2, पारस-1,परळी-5,चंद्रपूर-1,भुसावळ-4 असे 17 संच बंद आहेत. एकूण वीज निर्मिती संच 32 आहेत. त्यापैकी तब्बल 17 बंद आहेत.