शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

१६२ शेतकऱ्यांचे तगाई बोझे कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे ...

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे कमी केल्याने दूर झाल्या असून, तालुक्यात १६२ जणांचे बोझे कमी करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे, तर स्वतःचा पिकपेरा लावता येत असल्याने शेतकरी हायटेक झाला आहे.

सतत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, अडचणी दूर करण्यासाठी शासनाने स्वातंत्र्य दिनापासून शेतकऱ्यांना पीक पेरा लावण्याचे स्वातंत्र्य दिले, तर अनेक वर्षांपासून शासनाने तगाई कर्ज माफ करूनही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चारा तगाई, बंडिंग तगाईसह बंद पडलेल्या संस्थांचे बोझे सात बारावर दिसत होते. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नव्हते, तर खरेदी-विक्री, तसेच अनुदान आदींसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे बोझे करून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील संकटाचे बोझे हलके करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.

महसूल विभागातर्फे तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि तालुक्यातील आठही मंडळात तगाई बोझे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १६२ बोझे कमी करण्यात आल्याने शेतकरी मुक्त झाले आहेत. अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे, ई-पीक पेरा लावण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपल्या तलाठी पथकासह ग्रामीण भागात ॲप मार्गदर्शन करणारे कॅम्प सुरू केले असून, १५४ गावांपैकी १४६ गावनमध्ये ॲप नोंदणी झाली. १,४०१ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे, तर ४७५ शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा लावला आहे.

मंडळाधिकारी डी.एस.तारे, पी.एस. पाटील, व्ही.पी. पाटील, आय.एस. महाजन, तलाठी गणेश महाजन यांच्यासह इतर तलाठी हे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचा संप असतानाही त्यांच्याशिवाय ग्रामीण भागात फिरून शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक पेरा लावण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यात ८२ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रांपैकी ६९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड केली आहे. त्यात ४१ हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे.

स्वतः शेतात फोटो काढून पीक पेरा लावल्याने शेतकऱ्यांना धान्य विकताना, लाभ घेताना आता अडचणी येणार नाहीत.

210821\21jal_2_21082021_12.jpg

 बोजा निरंक झाल्यानंतर आंनदाने सातबारा उतारे दाखवताना शेतकरी (छाया :अंबिका फोटो)