शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

१६२ शेतकऱ्यांचे तगाई बोझे कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे ...

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे कमी केल्याने दूर झाल्या असून, तालुक्यात १६२ जणांचे बोझे कमी करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे, तर स्वतःचा पिकपेरा लावता येत असल्याने शेतकरी हायटेक झाला आहे.

सतत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, अडचणी दूर करण्यासाठी शासनाने स्वातंत्र्य दिनापासून शेतकऱ्यांना पीक पेरा लावण्याचे स्वातंत्र्य दिले, तर अनेक वर्षांपासून शासनाने तगाई कर्ज माफ करूनही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चारा तगाई, बंडिंग तगाईसह बंद पडलेल्या संस्थांचे बोझे सात बारावर दिसत होते. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नव्हते, तर खरेदी-विक्री, तसेच अनुदान आदींसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे बोझे करून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील संकटाचे बोझे हलके करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.

महसूल विभागातर्फे तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि तालुक्यातील आठही मंडळात तगाई बोझे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १६२ बोझे कमी करण्यात आल्याने शेतकरी मुक्त झाले आहेत. अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे, ई-पीक पेरा लावण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपल्या तलाठी पथकासह ग्रामीण भागात ॲप मार्गदर्शन करणारे कॅम्प सुरू केले असून, १५४ गावांपैकी १४६ गावनमध्ये ॲप नोंदणी झाली. १,४०१ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे, तर ४७५ शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा लावला आहे.

मंडळाधिकारी डी.एस.तारे, पी.एस. पाटील, व्ही.पी. पाटील, आय.एस. महाजन, तलाठी गणेश महाजन यांच्यासह इतर तलाठी हे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचा संप असतानाही त्यांच्याशिवाय ग्रामीण भागात फिरून शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक पेरा लावण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यात ८२ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रांपैकी ६९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड केली आहे. त्यात ४१ हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे.

स्वतः शेतात फोटो काढून पीक पेरा लावल्याने शेतकऱ्यांना धान्य विकताना, लाभ घेताना आता अडचणी येणार नाहीत.

210821\21jal_2_21082021_12.jpg

 बोजा निरंक झाल्यानंतर आंनदाने सातबारा उतारे दाखवताना शेतकरी (छाया :अंबिका फोटो)