शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

कोरोनाच्या संकटात पालिकेला दिले १५० ते २०० टन लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST

फोटो : 7.23 वाजेचा मेल.... लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे मृत्यूची झालेली वाढ पाहता जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू ...

फोटो : 7.23 वाजेचा मेल....

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे मृत्यूची झालेली वाढ पाहता जळगाव शहराच्या स्मशानभूमीत गरजू व निराधारांना अंत्यविधीसाठी लाकडे कमी पडू नये यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परिसरातील अवजड व जळाऊ लाकडे जळगाव महानगरपालिकेकडे मोफत सुपूर्द केली आहेत. अंदाजे ही १५० ते २०० टन लाकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्‍यात आली.

कोरोनाच्या या उदभवलेल्या सद्यस्थितीत स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठ परिसरातील जळाऊ लाकडे महानगरपालिकेकडे मोफत सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या ६५० एकरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातील कोसळलेली किंवा वाळलेली झाडे एकत्रित करुन ठेवली होती. त्यामध्ये निम, गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी तसेच काही काटेरी वृक्षांचा समावेश आहे. जळगाव महानगरपालिकेशी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला व स्मशानभूमीच्या दैनंदिन कामासाठी ही लाकडे मोफत देण्याची तयारी दर्शविली. महानगरपालिकेनेही त्याला प्रतिसाद दिला व त्यानुसार महानगरपालिकेच्या वाहनाने ही लाकडे उचलण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

महापौर, उपमहापौरांची विद्यापीठाला भेट

शनिवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, माजी महापौर तथा सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठाला भेट दिली व विद्यापीठ प्रशासनाला आभाराचे पत्र दिले. संकटाच्या काळात विद्यापीठाने पुढाकार घेऊन सामाजिक ऋण म्हणून मोफत लाकडे पुरविल्याबद्दल महापौर व आयुक्तांनी विद्यापीठाचे आभार मानले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, कनिष्ठ अभियंता पी.टी.मराठे, उद्यान अधीक्षक अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

सध्या कोरोनाच्या काळात मृतांची संख्या वाढली असून स्मशानभूमीत लाकडे कमी पडू नयेत यासाठी विद्यापीठाने जळगाव महानगरपालिकेला ही सर्व लाकडे मोफत देण्याचा निर्णय घेतला. हे विद्यापीठ संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला नेहमीच घावून जात असते. तोच पायंडा यावेळी देखील कायम ठेवण्यात आला.

- प्रा.डॉ.ई.वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ