शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

१५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार मागील ...

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात साधारणत: ४०० कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे ग्राहकांना वीज बिल भरताना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नाहीत. दरम्यान, कोरोनाचा कठीण काळ लक्षात घेता वीजतोडणी मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या परिस्थितीला तोंड देत आता कुठे जनता सावरत आहे. पण, महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज बिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या; मात्र वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारला जनतेची अवस्था समजत नाही का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

महावितरणने वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून द्यावी, तोपर्यंत एकही कनेक्शन तोडू नये, अशी मागणी जनतेतून होत आहे. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. याविरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीच्या वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे वीजतोडणी तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी भविष्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारला शेतकऱ्यांची अवस्था समजत नाही का?, लोकांना सध्या रोजगार नाही. दुसरीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. अशा काळात वीज कनेक्शन तोडणे प्रचंड संतापजनक बाब आहे. वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबली नाही तर भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल.

-ॲड. संजय महाजन, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी आघाडी

कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन असून, तो अजून पूर्ण उठलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी सुरळीत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे सक्तीची वीज बिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवण्यात यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. याबाबत लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

-दीपक वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धरणगावातील वीज तोडणी मोहिमेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून दोन हप्त्यांमध्ये ग्राहकांना सूट देण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.

-पप्पू भावे, पालिका गटनेते, शिवसेना

कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यावसायिकांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे वीज बिल भरणे काही नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करणे महावितरणने त्वरित थांबवले पाहिजे. यासंदर्भात आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधणार आहोत.

-चंदन पाटील, तालुका उपाध्यक्ष, काँग्रेस

थकबाकी असल्यामुळे मागील १५ दिवसात साधारण ३५० ते ४०० कनेक्शन तोडण्यात आली आहेत. दिवसाला साधारण १५ ते २० वीज कनेक्शन तोडली जातात. वीज बिल हप्त्यांमध्ये विभागणी करण्याची आम्हाला कोणतीही सूचना नाही. त्यामुळे संपूर्ण बिल भरणे आवश्यक आहे.

- एम. पी. धोटे, सहायक अभियंता, महावितरण, धरणगाव