शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

14 व्या वित्त आयोग निधी खर्चाबाबत बंधनामुळे ग्रामपंचायतीसमोर अडचणी

By admin | Updated: May 25, 2017 15:40 IST

शासनाने जखडले ग्रामपंचायतींचे हात जनता सुविधांपासून वंचित

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, दि.25 - शासनाच्या पुढील आदेशाशिवाय चौदाव्या वित्त आयोगाचा पैसे खर्च करू नये या आदेशामुळे ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले असून भर उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच करता येत नाही. शासनच जनतेच्या हाल अपेष्टे साठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केला आहे
     आमचा गाव आमचा विकास आराखडा योजनेंतर्गत शासनाने पुढील चार वषार्चा 2016 ते 2020 असा ग्रामपंचायतींच्या कामांचा आराखडा तयार करीत त्यांना ग्रामसेवक, अभियंता , गटविकास अधिकारी यांच्या समितिने मंजूर करून फेब्रुवारी पासून 14 व्या वित्त आयोगाचे 2 हफ्ते ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाले आहेत. या निधीतून अपूर्ण कामे, देखभाल दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण , उपजीविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय विकास, पाणी टंचाई, पाणी पुरवठाही वीज बिल भरणे आदी कामे करता येत होती. यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण व शिवार फेरी झाली. 
सर्व साधारण पणे एक एक गावाला  9 ते 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र शासनाने पुढील आदेश येईपयर्ंत 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करू नये असे निर्देश दिल्याने ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत हतबल ठरत आहेत. 73 व्या घटना दुरुस्ती नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचे धोरण असताना मात्र शासन असे अडथळे निर्माण करून ग्रामपंचायती खिळखिळ्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसेवक आणि पंचायत समित्या शासन आदेशाला बांधील असल्याने पैसे उपलब्ध असूनही जनता सुविधांपासून वंचित राहत आहे. नंतर परवानगी आल्यास मार्च पयर्ंतच्या मुदतीत कामे पूर्ण करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शासन स्तरावरून 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची परवानगी आणून ग्रामपंचायती स्वावलंबी करावे अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.