शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

14 व्या वित्त आयोग निधी खर्चाबाबत बंधनामुळे ग्रामपंचायतीसमोर अडचणी

By admin | Updated: May 25, 2017 15:40 IST

शासनाने जखडले ग्रामपंचायतींचे हात जनता सुविधांपासून वंचित

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, दि.25 - शासनाच्या पुढील आदेशाशिवाय चौदाव्या वित्त आयोगाचा पैसे खर्च करू नये या आदेशामुळे ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले असून भर उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच करता येत नाही. शासनच जनतेच्या हाल अपेष्टे साठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केला आहे
     आमचा गाव आमचा विकास आराखडा योजनेंतर्गत शासनाने पुढील चार वषार्चा 2016 ते 2020 असा ग्रामपंचायतींच्या कामांचा आराखडा तयार करीत त्यांना ग्रामसेवक, अभियंता , गटविकास अधिकारी यांच्या समितिने मंजूर करून फेब्रुवारी पासून 14 व्या वित्त आयोगाचे 2 हफ्ते ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाले आहेत. या निधीतून अपूर्ण कामे, देखभाल दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण , उपजीविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय विकास, पाणी टंचाई, पाणी पुरवठाही वीज बिल भरणे आदी कामे करता येत होती. यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण व शिवार फेरी झाली. 
सर्व साधारण पणे एक एक गावाला  9 ते 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र शासनाने पुढील आदेश येईपयर्ंत 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करू नये असे निर्देश दिल्याने ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत हतबल ठरत आहेत. 73 व्या घटना दुरुस्ती नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचे धोरण असताना मात्र शासन असे अडथळे निर्माण करून ग्रामपंचायती खिळखिळ्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसेवक आणि पंचायत समित्या शासन आदेशाला बांधील असल्याने पैसे उपलब्ध असूनही जनता सुविधांपासून वंचित राहत आहे. नंतर परवानगी आल्यास मार्च पयर्ंतच्या मुदतीत कामे पूर्ण करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शासन स्तरावरून 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची परवानगी आणून ग्रामपंचायती स्वावलंबी करावे अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.