शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

१४ हजार जणांना नाकारला ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

४५० अर्ज प्रलंबित : दीड हजार वाहने पाठवली परत लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ई-पास नसलेल्या दीड ...

४५० अर्ज प्रलंबित : दीड हजार वाहने पाठवली परत

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ई-पास नसलेल्या दीड हजारांच्यावर वाहनांना सीमेवरुन परत पाठविण्यात आले आहे तर १४ हजार ७४६ जणांना ई-पास नाकारण्यात आला आहे. आतापर्यंत ३५ हजार ५५९ जणांना ई-पास देण्यात आला असून, ४५० जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. ई-पास प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून, त्यात प्रवासाचे कारण व त्याबाबतचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु, ई-पासची प्रक्रिया करताना नागरिक फक्त आधारकार्ड जोडत असून, इतर कोणताही पुरावा जोडला जात नाही, त्यामुळे ई-पास नाकारला जात आहे.

कागदपत्रे व पुरावे जोडले तर एका मिनिटात पास मंजूर केला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या दालनाच्या बाजूलाच ई-पाससाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार नरेंद्र पवार व रवींद्र कापडणे यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वाधिक ई-पासचे अर्ज नाशिकसाठी येत असून, त्या खालोखाल पुणे व मुंबई शहरांसाठी येत आहेत. दवाखान्याचीच कारणे त्यासाठी दिली जात आहेत.

ई-पाससाठी मेडिकलचेच कारण

ई-पास काढण्यासाठी नागरिकांकडून दवाखान्याची कारणे सांगितली जात आहेत. ही कारणे देताना त्याबाबतचा कुठलाही पुरावा जोडला जात नाही. केवळ आधारकार्ड अपलोड केले जाते, त्यामुळे असे अर्ज नामंजूर होतात.

किती ई-पास दिले - ३५,५५९

प्रलंबित - ४५०

नामंजूर ई-पास - १४,७४६