शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

१४ हजार जणांना नाकारला ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

४५० अर्ज प्रलंबित : दीड हजार वाहने पाठवली परत लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ई-पास नसलेल्या दीड ...

४५० अर्ज प्रलंबित : दीड हजार वाहने पाठवली परत

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ई-पास नसलेल्या दीड हजारांच्यावर वाहनांना सीमेवरुन परत पाठविण्यात आले आहे तर १४ हजार ७४६ जणांना ई-पास नाकारण्यात आला आहे. आतापर्यंत ३५ हजार ५५९ जणांना ई-पास देण्यात आला असून, ४५० जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. ई-पास प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून, त्यात प्रवासाचे कारण व त्याबाबतचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु, ई-पासची प्रक्रिया करताना नागरिक फक्त आधारकार्ड जोडत असून, इतर कोणताही पुरावा जोडला जात नाही, त्यामुळे ई-पास नाकारला जात आहे.

कागदपत्रे व पुरावे जोडले तर एका मिनिटात पास मंजूर केला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या दालनाच्या बाजूलाच ई-पाससाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार नरेंद्र पवार व रवींद्र कापडणे यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वाधिक ई-पासचे अर्ज नाशिकसाठी येत असून, त्या खालोखाल पुणे व मुंबई शहरांसाठी येत आहेत. दवाखान्याचीच कारणे त्यासाठी दिली जात आहेत.

ई-पाससाठी मेडिकलचेच कारण

ई-पास काढण्यासाठी नागरिकांकडून दवाखान्याची कारणे सांगितली जात आहेत. ही कारणे देताना त्याबाबतचा कुठलाही पुरावा जोडला जात नाही. केवळ आधारकार्ड अपलोड केले जाते, त्यामुळे असे अर्ज नामंजूर होतात.

किती ई-पास दिले - ३५,५५९

प्रलंबित - ४५०

नामंजूर ई-पास - १४,७४६