शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वर्षभरात आढळले 140 क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:25 IST

अमळनेर : संसर्गजन्य असला तरी औषधोपचाराने क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकतो

धार, ता.अमळनेर : क्षयरोग म्हटला म्हणजे अनेकांना त्याची भीती वाटते. आपल्याकडे क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. देशात दररोज क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अमळनेर तालुक्यात वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासणी केली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले आहेत. दरम्यान, हा आजार संसर्गजन्य असला तरी तो पूर्णत: बरा होतो, असे ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिका:यांनी सांगितले.क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलेसिस’ नावाच्या जिवाणूपासून होत असतो. प्राचीन काळी याला ‘राजयक्ष्मा’ नावाने ओळखले जायचे.  क्षयरोग फुफ्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसिकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनाही होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ती शिंकते, खोकते तेव्हा हवेद्वारे क्षयरोगाच्या जिवाणूचा प्रसार होतो.अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आरएनटीसीपी सेंटर असून, यामार्फतही उपचार केले जातात. येथील प्रयोगशाळेत ‘एलईडी फ्लोरोसन्स’     हे अत्याधुनिक यंत्र आणण्यात आलेले आहे. या यंत्राद्वारे रुग्णाची थुंकी तपासली जाते. नवीन टेक्नॉलॉजी असल्याने पूर्वीपेक्षा 10 पटीने रिझल्ट चांगले मिळतात. क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू याद्वारे स्पष्ट दिसतात. गेल्या वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासण्यात आली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले. क्षयरोगींची ग्रामीण रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करण्यात येत असतो, असे  प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप अहिरराव व क्षयरोग आरोग्य भेटीदाता रमाकांत सैंदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.                    क्षयरोग संसर्गजन्य असला तरी, औषधोपचाराने हा आजार पूर्णत: बरा होतो. समतोल आहार, योग्य व्यायाम व पुरेशी विश्रांती याचा अंगीकार केल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे.                         -डॉ. प्रकाश ताळे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय,