शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वर्षभरात आढळले 140 क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:25 IST

अमळनेर : संसर्गजन्य असला तरी औषधोपचाराने क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकतो

धार, ता.अमळनेर : क्षयरोग म्हटला म्हणजे अनेकांना त्याची भीती वाटते. आपल्याकडे क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. देशात दररोज क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अमळनेर तालुक्यात वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासणी केली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले आहेत. दरम्यान, हा आजार संसर्गजन्य असला तरी तो पूर्णत: बरा होतो, असे ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिका:यांनी सांगितले.क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलेसिस’ नावाच्या जिवाणूपासून होत असतो. प्राचीन काळी याला ‘राजयक्ष्मा’ नावाने ओळखले जायचे.  क्षयरोग फुफ्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसिकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनाही होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ती शिंकते, खोकते तेव्हा हवेद्वारे क्षयरोगाच्या जिवाणूचा प्रसार होतो.अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आरएनटीसीपी सेंटर असून, यामार्फतही उपचार केले जातात. येथील प्रयोगशाळेत ‘एलईडी फ्लोरोसन्स’     हे अत्याधुनिक यंत्र आणण्यात आलेले आहे. या यंत्राद्वारे रुग्णाची थुंकी तपासली जाते. नवीन टेक्नॉलॉजी असल्याने पूर्वीपेक्षा 10 पटीने रिझल्ट चांगले मिळतात. क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू याद्वारे स्पष्ट दिसतात. गेल्या वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासण्यात आली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले. क्षयरोगींची ग्रामीण रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करण्यात येत असतो, असे  प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप अहिरराव व क्षयरोग आरोग्य भेटीदाता रमाकांत सैंदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.                    क्षयरोग संसर्गजन्य असला तरी, औषधोपचाराने हा आजार पूर्णत: बरा होतो. समतोल आहार, योग्य व्यायाम व पुरेशी विश्रांती याचा अंगीकार केल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे.                         -डॉ. प्रकाश ताळे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय,