शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

14 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो!

By admin | Updated: September 25, 2015 00:14 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. 37 लघु व तीन मध्यम प्रकल्पांसह प्रकाशा बॅरेजमध्ये 76 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा नोंदला गेला आहे. शिवाय 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून पाच प्रकल्पांमध्ये 90 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. दरम्यान, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पातील पाणीसाठा 36 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यंदा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना आणि सप्टेंबर मध्यावर असतानाही पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे संकट निर्माण झाले होते. अवघा 58 टक्के पाऊस झाला होता. तोदेखील अनियमित होता. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाला गेला होता. अनेक प्रकल्पांमध्ये ठणठणाट होता. परंतु वरुणराजाची कृपा झाली आहे. अक्षरश: धो-धो पाऊस बरसला. मागची सर्व कसर या पावसाने काढून टाकली. त्याचा परिणाम सहाजिकच प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यात झाला. एक, दोन नव्हे तब्बल 14 प्रकल्प ओसंडून वाहू लागले. नंदुरबारला ज्या प्रकल्पांचा पाण्याचा आधार आहे तो आंबेबारा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. वीरचकमधील पाणीपातळी थेट 25 टक्क्यांनी वाढली, तर खोलघर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले आहे.

20 टक्के जादा

सप्टेंबरच्या तिस:या आठवडय़ात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमधील पाणीसाठा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर्पयत पाणीसाठय़ाची टक्केवारी 58 टक्के होती. यंदा ती 76.5 टक्के आहे. 37 लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी 69 टक्के, तर यंदा 76.91 टक्के पाणीसाठा आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांची संख्यादेखील यंदा जादा आहे. गेल्या वर्षी 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, तर यंदा 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची परिस्थिती समाधानकारकच म्हणावी लागेल.

मध्यम प्रकल्प

जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी रंगावली प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात देखील 100 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील शिवण प्रकल्पात 37.43 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय प्रकाशा बॅरेजमध्येदेखील पाणी अडविल्याने 83 टक्के पाणीसाठा झाला आहे.

शहरवासीयांना दिलासा

नंदुरबारला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पात नऊ टक्क्यांवरून 37.43 टक्के पाणीसाठा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शहरासाठी 50 टक्के पाणीसाठा राखीव असलेला आंबेबारा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लो झालेले पाणी वीरचक प्रकल्पात येते, तो खोलघर प्रकल्प देखील ओसंडून वाहत आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस झाला, तर वीरचकची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर्पयत वीरचक प्रकल्पात 54 टक्के पाणीसाठा होता. यंदा 37.43 टक्क्यांर्पयत आहे.

पाणी सोडू नये

शासनाचे पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे अनेक राज्यातील अनेक प्रकल्पातील पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्याच मुद्यावर नंदुरबारला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठादेखील आरक्षित करणे आवश्यक आहे. जोर्पयत प्रकल्प पूर्ण 100 टक्के भरला जात नाही, तोर्पयत या प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग करू नये, अशी मागणी होत आहे. त्या दृष्टीने पालिकेनेही शासन व प्रशासनाकडे प्रयत्न चालविले आहेत. तसे झाल्यास उपलब्ध पाणीसाठा सध्याच्या पाणीपुरवठय़ाच्या नियोजनानुसार किमान मे महिन्यार्पयत पुरेल असा अंदाज आहे.

तरीही पाणी जपून वापरावे

पाण्याचे संकट टळले असले तरी शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. सध्या एक दिवसाआड अर्धातास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही ही वेळमर्यादा कायम राहणार आहे. नागरिकांनी नळांना तोटय़ा लावाव्या, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पावसाने वेळीच हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे शुक्रवारी पालिकेत पूजेचे देखील आयोजन केले आहे. शहरवासीयांना आमंत्रीत देखील करण्यात आले आहे.

भूगर्भातील पातळीला फायदा

भूगर्भातील पाणी पातळीला या पाणीसाठय़ामुळे फायदा होणार आहे. गेल्या वर्षी कमी पजर्न्यमान आणि दुष्काळी स्थिती यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठय़ांमुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.