शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

पूरामुळे सर्व मार्ग बंद; उपचारासाठी नेण्यासाठी नदीवर आणले, पण १३ वर्षीय बालिकेने प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 10:34 IST

जळगावमधील बोरी नदीला पूर आलेल्याने येण्या-जाण्यास दूसरा रस्ता अथवा पूल नाही.

जळगाव : बोरी नदीला पूर आलेल्याने येण्या-जाण्यास दूसरा रस्ता अथवा पूल नाही. याचवेळी गावातील १३ वर्षाची मुलगी तापाने फणफणत होती. मात्र मार्ग बंद असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात घेऊन जाता आले नाही. गावातही डॉक्टर नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी नेण्यासाठी नदी काठावर आणले. पण दुर्दैवाने तिथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला. आदिवासी आरुषीचा करूण अंत झाल्याने संपूर्ण गाव हळहळला. 

तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल ( १३ ) आसे या मृत मुलीचे नाव आहे. आरुषी ही तापाने आजारी होती. मात्र बोरी नदीला पूर आलेला आणि वर्षानुवर्षे हे गाव पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असत. मात्र पूर जास्त असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही तर डॉक्टरला गावात येता येत नाही. मंगळवारी  सकाळी मुलीचा ताप वाढला अस्वस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र   दुर्दैव आड आले तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. तरी लाडकी लेक वाचावी म्हणून चार पाच लोकांनी मोटरसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून  बोरी नदी पार केली मात्र तिला दवाखाण्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले.

सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे गावातून बाहेर निघायला जागा नाही दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी , पुनर्वसन अधिकारी नव्या  पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत दवाखाण्यात कसे नेऊ आम्ही जगावे की मरावे असा संतप्त सवाल केला होता. मात्र निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही.  गावात डॉक्टर पाठवले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोट देखील पाठवली नाही. 

आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार? दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटी देखील त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत लोकमतने प्रकाश झोत टाकला होता.  एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना गावासाठी पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही यापेक्षा विदारक चित्र काय असावे.