शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

११ वी सायन्सच्या तुकड्या झाल्या फुल्ल; बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST

रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल ...

रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी सायन्सच्या चारही तुकड्या फुल्ल झाल्या आहेत. अजूनही शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला संबंधित वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात तातडीने आदेश पारीत करावेत अशी मागणी होत आहे.

शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही जुनी व गुणात्मक दर्जाची शालेय शिक्षण संस्था असल्याने शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी येथे मोठा लोंढा वळत असतो. यंदाही या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्सच्या प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी वर्गाची कमालीची झुंबड उडाली असून या कनिष्ठ महाविद्यालयातील चार तुकड्यांमधील ३२० विद्यार्थी क्षमतेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र गुणवत्ता प्राप्त अजून शेकडो विद्यार्थी अद्याप वंचित असून शालेय प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये या शासन अध्यादेशानुसार प्रवेश नाकारला आहे.

शासन अध्यादेशानुसार शहर व परिसरातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत तातडीने आदेश पारीत करावा अशी मागणी वंचित विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बाब धसास लावावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात शालेय प्रशासनाशी संपर्क साधला असता इयत्ता ११ वी सायन्सच्या तुकड्यांमधील क्षमता पूर्ण झाली आहे; मात्र पालक व सामाजिक तथा राजकीय संघटनांकडून प्रवेश मिळवण्यासाठी अनेक निवेदनांद्वारे मागणी होत असल्याची पुष्टी जोडली आहे.