शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

११ वी सायन्सच्या तुकड्या झाल्या फुल्ल; बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST

रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल ...

रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी सायन्सच्या चारही तुकड्या फुल्ल झाल्या आहेत. अजूनही शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला संबंधित वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात तातडीने आदेश पारीत करावेत अशी मागणी होत आहे.

शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही जुनी व गुणात्मक दर्जाची शालेय शिक्षण संस्था असल्याने शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी येथे मोठा लोंढा वळत असतो. यंदाही या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्सच्या प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी वर्गाची कमालीची झुंबड उडाली असून या कनिष्ठ महाविद्यालयातील चार तुकड्यांमधील ३२० विद्यार्थी क्षमतेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र गुणवत्ता प्राप्त अजून शेकडो विद्यार्थी अद्याप वंचित असून शालेय प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये या शासन अध्यादेशानुसार प्रवेश नाकारला आहे.

शासन अध्यादेशानुसार शहर व परिसरातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत तातडीने आदेश पारीत करावा अशी मागणी वंचित विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बाब धसास लावावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात शालेय प्रशासनाशी संपर्क साधला असता इयत्ता ११ वी सायन्सच्या तुकड्यांमधील क्षमता पूर्ण झाली आहे; मात्र पालक व सामाजिक तथा राजकीय संघटनांकडून प्रवेश मिळवण्यासाठी अनेक निवेदनांद्वारे मागणी होत असल्याची पुष्टी जोडली आहे.