शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११२८ हेक्टरला बसलाय गारपीटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:30 IST

अस्मानी संकट

ठळक मुद्देकृषी विभागाचा अंतिम अहवाल जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानचार तालुक्यांना फटका

जळगाव: नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २४३१ शेतकºयांच्या ११२८ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. त्यापैकी ९४४ शेतकºयांच्या ४१२.३० हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर १४८७ शेतकºयांचे ७१६.४६ हेक्टरचे ३३ टक्क्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद करण्यात आले आहे. शासनाला हा अहवाल रवाना झाला आहे.११ व १३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्ह्यात जळगाव, जामनेर, रावेर व मुक्ताईनगर या चार तालुक्यांना गारपीटीचा फटका बसला होता. त्यात प्राथमिक नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र नुकसान भरपाईसाठी अंतीम अहवाल पाठविणे बाकी होते. त्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक अशी विभागणीकरून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम अहवाल सादर झाला आहे. त्यात जळगाव, रावेर व जामनेर या तीन तालुक्यात ९४४ शेतकºयांचे ४१२.३० हेक्टरवर ३३ टक्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यात जळगाव तालुक्यात १०५ शेतकºयांचे १४५ हेक्टर, जामनेर तालुक्यात ८३२ शेतकºयांचे २६३.८० हेक्टर, रावेर तालुक्यात ७ शेतकºयांचे ३.५० हेक्टरचे नुकसान झाले आहे.७१६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानरावेर, मुक्ताईनगर व जामनेर या तीन तालुक्यातील १४८७ शेतकºयांचे ७१६ .४६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात रावेर तालुक्यात ३७ शेतकºयांचे ४२.७० हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात ८ शेतकºयांचे ९.५० हेक्टर तर जामनेर तालुक्यात १४४२ शेतकºयांचे ६६४.२६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.