शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

११ वर्षांची प्रतीक्षा एकाच दिवसात पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST

एसपींचा धाडसी निर्णय : आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या सुनील पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सरकारी काम अन् ...

एसपींचा धाडसी निर्णय : आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या

सुनील पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी शासकीय कामाची आपल्याकडे पद्धत रूढ झालेली आहे. ज्याचा कोणी वाली नाही त्याची तर अवस्था यापेक्षाही बिकट होते. पोलीस खात्यात संघटना नसल्याने आवाज उठवता येत नाही, त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याच मुद्द्याला स्पर्श केला व तब्बल अकरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना एकाच दिवसात नियुक्ती देऊन महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला.

दरम्यान, पोलीस कर्मचारी असो किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात डॉ. प्रवीण मुंढे हे अग्रेसर असून, महाराष्ट्रातील पहिले पोलीस अधीक्षक ठरले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनीच एका कार्यक्रमात हे जाहीर केले आहे.

प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के जागा भरण्यास पोलीस अधीक्षकांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. २०१०पासून जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक बदलले मात्र केवळ शिफारशींनुसार पाच ते दहा कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. आपल्या हक्कांपासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचे डॉ. मुंढे यांच्या निदर्शनास आले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. मुंढे यांनी स्वतः जातीने यात लक्ष घातले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापना प्रमुख दीपक जाधव यांना सोबत घेऊन रखडलेली ही प्रक्रिया काही दिवसात पूर्ण केली. २०१५पर्यंत रखडलेल्या सर्व बदल्या एकाच दिवसात मार्गी लावल्या.

जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या ५७५ कर्मचाऱ्यांपैकी यंदा १६१ जणांना आंतरजिल्हा बदलीनुसार जिल्ह्यात येण्यास स्वीकृती मिळाली असून, त्यापैकी ६२ जण हजरही झाले आहेत.

जिसका कोई नही उसका भगवान है !

पोलीस दलात आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून ठरलेल्या प्रकियेनुसार अर्ज करण्यात आले. प्रत्येक वर्षी पात्र ५ टक्के याप्रमाणे पात्र कर्मचारी आंतरजिल्हा बदलीनुसार घेेणे अपेक्षित असताना याकडे तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. तसेच अर्ज करणाऱ्यांपैकी मंत्री, राजकीय पुढारी यांच्यासह इतरांच्या शिफारशीनुसार कर्मचारी घेतले गेले. अशाच पध्दतीने २००१ ते २०१० दरम्यान आलेल्या प्रत्येक पोलीस अधीक्षकांनी केवळ शिफारशींनुसार दरवर्षी १५ ते २० कर्मचारी घेतले, इतरजण प्रतीक्षेतच राहिले. या कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नव्हते. डॉ. प्रवीण मुंढे हेच भगवान रुपी या कर्मचाऱ्यांचे वाली ठरले, परंतु ते हे मानायला तयार नाहीत, आपण केवळ आपले कर्तव्य बजावले, असे मानतात.

केवळ रजिस्टर नोंदी

२०१०मध्ये असलेल्या पोलीस अधीक्षकांनी एक स्वतंत्र रजिस्टर तयार करुन आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची त्यात नोंद घेतली. मात्र, आंतरजिल्हा बदलीपात्र कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नाही. तेव्हापासून ते आधीच प्रलंबित असलेले अर्ज व यात प्रत्येक वर्षी पात्र कर्मचारी करत असलेले अर्ज यामुळे यादी लांबलचकच होत गेली. मात्र, अधिकारात असतानाही एकाही पोलीस अधीक्षकाने संबंधित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवली नाही. डॉ. मुंढे यांनी आंतरजिल्हा बदली, पदोन्नती, अनुकंपावर नोकरीत सामावून घेण्याचे धाडसी निर्णय घेतले. त्याशिवाय चूक केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दोषांसह स्वीकारुन खरी पालकत्वाची भूमिका निभावली आहे.

कोट....

बदली प्रक्रिया कोणतीही असो शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच करावी लागते. आपण आपले कर्तव्य बजावले आहे. प्रत्येक वर्षी पाच टक्केप्रमाणे कर्मचारी घेण्यास मुभा दिली आहे. त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया राबवली. प्रत्येक वर्षी याच पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही.

- डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक.

अशी आहे कर्मचाऱ्यांची संख्या

एकूण प्रलंबित : ५७

स्वीकृती दिलेले कर्मचारी : १६१

हजर झालेले कर्मचारी : ६२

स्वीकृती रद्द केलेले कर्मचारी : २१

हजर न झालेले कर्मचारी : ७८

एकूण शिल्लक प्रस्ताव : ४१४

वर्षनिहाय शिल्लक प्रस्ताव

वर्ष संख्या

२०१५ ५२

२०१६ ८५

२०१७ १०६

२०१८ १००

२०१९ ४३